shope
एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स

एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स २०१० वर्षांपासून सतत कृषी क्षेत्रामध्ये संशोधन व शेतमाल उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. याशिवाय कमीत कमी खर्चा मध्ये जास्तीत जास्त वजनाचे तर निरोगी विषमुक्त फळे ,भाज्या ,धान्य पिके उत्पादनासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच निर्माण झाली एस व्हि अग्रो सोल्युशन ही संस्था . शेतकरी बंधूंनो आपल्या साठी लागणारे सर्व प्रकारचे द्रव्य उपलब्ध असतात. परंतु ती योग्य वेळी पिकांना उपलब्ध होत नाही. अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जिवाणू ही माहिती त्या पर्यावरणात कमी अधिक प्रमाणात असतात. परंतु जिवाणूंना वाढीसाठी लागणारे वातावरण व जीवन वाढीसाठी पूरक घटक पुरवठा केल्यास मातीमध्ये उपयोगी जिवाणू भरमसाठ वाढतात व ते पिकांना लागणारे अन्नघटक उपलब्ध करून देतात. पर्यायाने पिकांचे उत्पादन वाढते व दर्जा सुधारतो म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत. पूर्णपणे घटकांवर आधारित उत्पादनांची शृंखला.

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १

हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे परंतू का कुनास ठाऊक कुनिच या विषयावर वाच्यता करताना दिसत नाहीत. सर्वात पहिले निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय ते पाहूयात, (वनस्पती शी निगडीत विषय) मातीमधे ऊगवनार्या सर्वच वनस्पती या निगेटिव्ह चार्ज च्या प्रभावाखाली असतात कारण पृथ्वी हिच सर्वात मोठा निगेटिव्ह चार्ज चा स्त्रोत आहे, निगेटिव्ह चार्ज म्हणजे परत माघारी जानारा विद्युत प्रवाह, ( सर्व  विश्वच मग सजिव या निगेटिव्ह व पाॅजिटिव्ह विद्युत तरंगाच्या अंमला खाली सतत असतात) विषेशतः वनस्पती या निगेटिव्ह तंरगा च्या प्रभावा खाली असतात, ( माणूस सुद्धा या दोन  ( - + ) चार्ज मधे च असतो, फरक एवढाच की माणसाच्या हृदयात  पाॅजिटिव्ह  चे निगेटिव्ह करंट मधे रूपांतर  सतत होत असते, यालाच मानसाचा जिव अस म्हणत असावेत, प्रत्येक सजिव (वनस्पती सोडून ) अश्याच प्रकाराने जिवंत आढळतो) खर म्हणजे पाॅजिटिव्ह भार /करंट/चार्ज / प्रवाह म्हणजे ऊर्जा. (तारेतुन जाणार  विद्युत प्रवाह फारच शक्तिशाली असतो व सजिवां मधे आढळणारा प्रवाह खूपच कमजोर असतो ) याच ऊर्जेच्या जोरावर सर्व सजीव जगत असतात, हिच ऊर्जा मात्र संघर्षातुनच (कुठल्यातरी घर्षणाने) तयार होत असते.   अर्थात अनेक स्थित्यंतरातून  (conversions) ही ऊर्जा तयार होते, ही ऊर्जा तयार होताना अनेक प्रकारची संप्रेरके (हार्मोन्स) वापरली जातात व नविनही तयार होत असतात, गरजेपुरती ऊर्जा सजिव शरीरात साठविली जाते काही ऊर्जा  तात्काळ जिवंत राहण्यासाठी वापरली जाते काही ऊर्जा शारिरीक हालचाली साठी वापरली जाते, थोडीफार शिल्लक ऊर्जा परत हृदयात  नष्ट केली जाते (पाॅजिटिव्ह चे निगेटिव्ह मधे रूपांतर). हे सर्व वनस्पती सोडून इतर सजिवांमधे घडते. आता वनस्पती (द्राक्ष वेल) मधे कसे ऊर्जेचे संचलन होते ते पाहू,  वनस्पती मध्ये हृदयाचा रोल माती/जमिन करत असते. (वनस्पती सोडून सर्वच सजिवांना जगन्यासाठी किंवा ऊर्जा प्राप्त करण्यासाठी दुसर्या कुनाचातरी आधार घ्यावा लागतो ) वनस्पती ना मात्र निसर्ग च स्वतः जगवितो, पोसतो व तिची काळजी घेतो . आणि या वनस्पती चे हृदय थेट माती/जमिन च आहे. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २ 

वनस्पती सोडून इतर सजिवांना  ऊर्जा प्राप्तीसाठी वनस्पती किंवा इतर सजिवांचा आधार घ्यावा लागतो मात्र वनस्पती  कुनाचाच आधार घेत नाही उलट निसर्ग च वनस्पती ला आधार देत असतो. वनस्पतीला लागणारी ऊर्जा सुर्यप्रकाश, पाणी, हवा व माती संयोगातुन पुरविली जाते. याच प्रक्रियेत निगेटिव्ह चार्ज चा मोठा रोल असतो, निगेटिव्ह च का ? 
वनस्पती ही मातीवर/ जमिनीवर स्थित असते व जमिन कुठल्याही प्रकारच्या  विद्युत प्रवाहाला स्वतः कडे खेचते व निगेटिव्ह ( निष्क्रिय) करत असते.  अर्थातच जमिनीवर ऊगवलेली / लावलेली वनस्पती ही ऊत्तम विद्युत सुवाहक (कंडक्टर) म्हणून काम पहाते. ( म्हणूनच आकाशात तयार झालेली धनभारित विज ऊंच झाडावर पडते नव्हे तर झाड या विजेला स्वतः कडे खेचून घेते) थोडक्यात वनस्पतींवर निगेटिव्ह चार्ज/भार अघिक असतो. व वनस्पती सतत बाहेरून येनारे सर्व प्रकारचे भार/ चार्ज स्वतः खेचून जमिनीकडे पाठवत असते,  (अलिकडेच याच नियमांचा आघार घेऊन ESS नावाची आधुनिक फवारणी यंत्रणा काम करते,  फवारणी द्रावणावर एका विशिष्ट तंत्राने प्रत्येक द्रावणाच्या सुक्ष्म कणावर पाॅजिटिव्ह चार्ज निर्माण केला जातो व द्राक्ष वेल नियमानुसार ते कण स्वतः कडे खेचून घेते). वनस्पती (द्राक्ष वेल) याच नैसर्गिक नियमामुळे स्वतः साठी लागणारे अन्न व पाणी वर वर खेचत असते, गंमत इथेच आहे, द्राक्ष वेलीत पाने इतर वनस्पतींच्या तुलनेत पाने मोठ्या आकाराची असतात, व ती जास्त सुर्यप्रकाश व कार्बन डाय ऑक्साईड ग्रहण करतात या दोहोंच्या संयोगातुन पाॅजिटिव्ह चार्ज/ ऊर्जा तयार होते.  व ती तात्काळ ( सगळी नव्हे,  काही पोषणा साठी, काही हालचाली साठी व काही निष्क्रिय करण्यासाठी) काही प्रमाणात नियमानुसार जमिनीकडे ( via Phloem )  पाठविली जाते. अगदी त्याच वेळी किंवा तेव्हाच जमिनीतून एक अन्न व पाणी घेऊन जाणारी तुकडी  (via Xylem) पानांकडे सरकते.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ४

वनस्पतींच्या विकासात व गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने  वाढीस निगेटिव्ह चार्ज बर्याच अंशी कारणीभूत असतो हे आता समजले असेलच, तसेच वनस्पती व निसर्ग यांच नात नक्की कसे असते हे एक गुढच असावे असे मला वाटते. निसर्गाच्या इश्याऱ्यावरच वनस्पती आपला जिवनक्रम सपन्न करत असतात व वनस्पतीं च्या सानिध्यामुळेच निसर्ग  त्याला हव तस घडवुन आणत असतो.  याच निसर्गाने वनस्पतीं साठी ठरलुन दिलेले  काही  नियम असतात, याच नियमानुसार (तत्वावर) व्यवसाईक शेतीची तत्वे आधारलेली आहेत. नैसर्गिक शेती व व्यवसाईक शेती किंवा आधुनिक शेती असे आपल्याकडे अनेकदा ऊलटसुलट चर्चिले जाते, खर तर गेली कित्येक शतके मानव जी वनस्पतींच्या मदतिने शेती करत आलाय याला नैसर्गिक शेती असे म्हणता येनार नाही खर तर शेतकरी वनस्पती ला नैसर्गिक पद्धतीने वाढूच देत नाही, निसर्ग नियमांचा फायदा घेत वनस्पती कडून हव तसे उत्पादन काढून घेतले जाते,  म्हणूनच आजची सर्वच शेती ही "अनैसर्गीक शेती पद्धती " आहे  असे म्हणावे लागेल. निसर्गाने वनस्पती (द्राक्ष वेल) साठी ठरवुन दिलेल्या अश्याच एका नियमाचा आपण आज अभ्यास पाहणार आहोत. वनस्पती निसर्गाच्या संकेतानंतरच उत्पादीत होतात. तो नियम असा आहे "जेव्हा जेव्हा वनस्पतींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा तेंव्हा वनस्पती पुनरउत्पादनाकडे वळते " हाच तो निसर्ग नियम. आधुनिक शेती पद्धती मध्ये अनेक फळपिकांमधे याच तत्वाचा (नियमांचा) वापर करून बहार घेतले जातात, पेरू, डाळिंब, सिताफळ सारख्या पिकांमधे ठराविक विश्रांती नंतर मुळे ऊघडी पाडून थोडीफार मुळे तोडली जातात व त्या झाडांना एक प्रकारचा ताण ( त्रास) दिला जातो व बहार देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. द्राक्ष वेलीस गर्डलिंग करून असाच ट्रेस दिला जातो परिणामी हमखास बहार काढला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातुन पाहिल्यास ज्यावेळी वनस्पती वरिल निगेटिव्ह चार्ज (प्रभाव) अतिशय कमी होतो त्या नंतरचा काळ वनस्पती कडून उत्पादन घेण्यासाठी योग्य असतो, द्राक्ष वेलीवरील (बहार   धरण्यासाठी)  निगेटिव्ह चार्ज कमी करण्याचा  काळ म्हणावे ऑक्टोबर छाटणी पुर्वी दिला जाणारा ताण हा होय. द्राक्ष बागेस योग्य पद्धतीने ताण दिल्यास (द्राक्ष वेलीवर चांगल्या मजबुत व पक्व काड्या तयार झाल्या असल्यास , जमिनीच्या प्रकारा नुसार 15 ते 20 दिवसांचा ताण पुरेसा होतो) हमखास व भरपूर  बहार निघतो, वनस्पती ची पाने (द्राक्ष वेल) भरपूर सुर्यप्रकाश व कार्बनडायऑक्साईड  वायुच्या मदतिने (फोटोसिंथेसीस) सतत अन्न निर्मिती करत असतात याच अन्न निर्मिती प्रक्रियेतून धन भाराची (पॉझिटीव्ह चार्ज) निर्मिती होत असते परंतु त्या धन भारात बल (फोर्स) निर्माण होत नाही कारण मुळातच द्राक्ष वेलीवर निगेटिव्ह चार्ज प्रभाव अधिक असल्या मुळे तो लगेचच उदासीन (मे युट्रल ) अवस्थेत जातो पण ही उदासीन अवस्था वेलीच्या मुळांजवळ येऊन थांबते. मात्र जेव्हा द्राक्ष वेलीची मुळे हे वरून येणार्या भाराचे (चार्ज) उदासीनीकरणाचे काम थांबवतात तेव्हा मात्र वेलिच्या आंतरगत भागात वेगवान हालचाली सुरू होतात व हाच निगेटिव्ह चार्ज "निगेटिव्ह फोर्स" मध्ये बदलायला सुरवात होते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ५

बहुवर्षायु वनस्पतींचे बहार येणे किंवा नियमित  उत्पादन देणे हे हवामानात होणारे बदल  व भौतिक परिस्थितीत होणारे प्रचंड टोकाचे बदल यावर अवलंबून असते . वनस्पतींना जर फारच सुखदायक हवामानात, अखंड व नियमित पाणी अन्न मिळत राहिले तर त्या वनस्पती कमी किंवा अनियमित उत्पादन (फुले, फळे,  बिया इत्यादी) देतात. अगदी ऊदाहरणच द्यायचे झाल्यास कोकणात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो इतका पाऊस पडतो की जमिनीत ऊपलब्ध असनारी बरिचशी अन्नद्रव्ये अती निचरा होऊन वाहून जातात पण पावसाळा संपला की त्याच कोकणात अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते, एवड्या कमालीची विषम परिस्थितीतही तेथिल आंब्याला नियमित बहार येतो व भरपूर उत्पादन मिळते.  इकडे देशावर म्हणजेज पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात होतो पावसाळा संपला तरी पाणी परिस्थिती चांगली असते पण इकडच्या आंबा बागांना नियमित बहार येत नाही (काही आंबा झाडांना एक वर्ष आड आंबा लागतो) याच खास  कारण म्हणजे आपल्याकडील  आंबा झाडांमधे निगेटिव्ह चार्ज  चा प्रवाह नियमित जास्त काळ  चालूच रहातो व कोकणात मात्र निगेटिव्ह चार्ज चे रूपांतर निगेटिव्ह फोर्स मधे लवकरच होत असते. आता हा निगेटिव्ह फोर्स द्राक्ष वेलीवर कसे काम करतो पाहूया, खरड छाटणी नंतर बागेस भरपुर अन्न व पाणी देऊन निगेटिव्ह चार्ज नियमित केला जातो (मुळे सक्रिय केली जातात तेव्हाच जमिनीतुन अन्न पाणी वर सरकते) तेव्हाच नविन काड्या व अन्नद्रव्ये साठवूनक करणारी पाने तयार होतात. याच काळात भरपुर व नियमित सुर्यप्रकाशाची ही गरज असते याच काळात मुळे प्रचंड आक्रमक झालेली असतात. याच काळात द्राक्ष वेलीस आवश्यक असणारी अन्नद्रव्ये पुरवठा करणे गरजेचे असते, जेवढा निगेटिव्ह चार्ज चा प्रवाह जास्त काळ राहिल त्याच प्रमाणात मालकाड्या तयार होणे व पुढे उत्पादन किती तयार होने हे अवलंबून असते. द्राक्ष बागेत  साधारणपणे 120 ते 135 दिवस ही प्रक्रिया चालु असावी लागते. सुरवातीचा काळ म्हणावे खरड छाटणी नंतर बागेची काडी निर्मिती होत असताना जर हवामानात थोडाही फरक पडल्यास किंवा ढगाळ वातावरण, अकाली पाऊस पडल्यास लगेच थेट पहिला परिणाम हा द्राक्ष मुळीवर  होत असतो, पान देठात तयार होणारा धन भार मंदावतो परिणाम निगेटिव्ह चार्ज चा प्रवाह थांबतो परिणामी मुळीचे कार्य अचानक बंद पडते प्रसंगी द्राक्ष वेल आजारी सुद्धा पडते (डाऊणी, करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो) पुढे याच कारणामुळे घड जिरन्याची समस्या तयार होते. (एसव्हि किटोन याच काळात नियमित वापर झाल्यास म्हणजे जमिनीतुन व पानांवाटे वापरल्यास ते द्राक्ष मुळांना काम तात्काळ काम बंद करू देत नाही,  वनस्पती च्या याच संस्थेत किटोन खुबिने काम करते). थोडक्यात काडी पक्व होईपर्यंत मुळीचे काम विनासायास सुरळीत चालणे गरजेचे असते. पुढिल फळ छाटणी च्या अगोदर 15 ते 20  दिवस बागेस अन्न पाण्याचा  ताण द्यावा म्हणजे काडीवरिल डोळ्यामधे घड निर्मिती होते,  याच ताण देण्याच्या काळात द्राक्ष वेलीत प्रचंड बदल चालु होतात, (ताण देने म्हणजे अचानक पाणी देने बंद, खत देण्यासाठी बेड वर खड्डे पाडने, बेडवरिल माती मोकळी करने इत्यादी) जवळपास  4 -5 महिने द्राक्ष वेल मजेत असते मुळे चांगली सक्रिय असतात आणी अचानक हे सगळे चोचले बंद होतात,  द्राक्ष वेलीची मुळे कोरडी पडतात अन्न पाणी पुरवठा बंद होतो (मुळाना एक प्रकारचा झटका बसतो) द्राक्ष वेल याच काळात जगण्यासाठी प्रचंड धडपड करते, पाने, काडी व खोडात धन भार सक्रिय असतो पण तो धन भाराचा प्रवाह जमिनीकडे पोहचू शकत नाही, अतिशय क्षीण झालेल्या निगेटिव्ह भारामुळे पाने व शेंड्याकडून आलेली द्रव्ये मुळांपर्यंत येऊन थांबतात व हा प्रवाह वेग अचानक थांबतो यालाच निगेटिव्ह फोर्स म्हणावे लागेल. (या सगळ्या धडामोडी अतिशय वेगाने व कमी कालावधित घडते) शेंडा व पाने पोषन होत असताना यातीलच काही द्रव्ये व प्रक्रियेतुन तयार झालेली ऊदासीन द्रव्ये व धन भारित अन्न कण मुळीवाटे जमिनीत परत सोडत असतात परंतु निगेटिव्ह फोर्स मध्ये मुळी काम करणे बंद झालेली असते (निगेटिव्ह भार कमी झाल्यामुळे) मुळी पांढरी व कोवळी न रहाता ती तपकिरी व जून झालेली असते, या मुळीत याच काळात अनेक प्रकारचे  क्षार व काही विषारी द्रव्ये जमा झालेली असतात (गार्बेज एन्झाईम्स) अगदी याच काळात द्राक्ष वेल पुनरुत्पादनाकडे वळते व परिणामी काडीवरी डोळ्यात घड निर्मिती होते,  मगच या द्राक्ष वेलीकडून इच्छीत उत्पादन घेता येणे सहज शक्य  होते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ६

निसर्ग व वनस्पती हा सबंध खुप दृढ असला तरी सुद्धा निसर्गाच्या लहरी पणाचा फटका वनस्पती ला खुप सोसावा लागतो, निसर्गाच्या या स्वभावा मुळे वनस्पती स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्याची सतत धडपड करत रहातात, वनस्पतींचा निसर्गावर मात करण्याचाच कल जास्त असतो व आपली स्वतःची नविन पिढी तयार करत असतात. (हेच मानव व इतर सृष्टीचे अन्न असते) आपण या पुर्वी च्या भागांमधे पाहिले आहे की द्राक्ष वेल भरपूर विश्रांती नंतरच परत नविन बहारासाठी सिद्ध होते, या विश्रांती काळातच बागेचे पोषन होणे गरजेचे असते, आता आपल्याला किती उत्पादन घ्यायचे आहे ते निच्छित करावे लागेल, पहिल्या बहारात किती उत्पादन मिळाले तेही महत्वाचे असते,  बर्याचदा पहिल्या बहारात जर जास्त उत्पादन मिळाले असल्यास पुढिल बहारात कमी उत्पादन मिळते व पहिल्यांदा कमी उत्पादन मिळाले असल्यास पुढिल बहारात जास्त उत्पादन मिळते  असाही अनुभव पहायला मिळाला आहे, परंतु खरड छाटणी नंतंर बागेची विषेश काळजी घेतल्यास नियमित एकसारखे उत्पादन घेता येने शक्य आहे, (बागेस अन्न पाणी, योग्य प्रकारे छाटणी ईं व्यवस्थापन ही महत्वाचे आहे). विश्रांती काळात प्रत्येक वेलीवर जातपरत्वे योग्य काडी संख्या व पाने शेवटपर्यंत निरोगी व धष्टपुष्ट असणे गरजेचे आहे, अर्धवट पोषनातुनच अनेक समस्या निर्माण होतात, द्राक्ष वेल रोग किडीस लवकर बळी पडणे, मालकाड्या अपक्व रहाणे, घड जिरने इत्यादी समस्यांना मग सामोरे जावे लागते, प्रत्येक वर्षी फळछाटणी पुर्वी द्राक्ष बागेतील मातीची प्रयोग शाळेत माती परिक्षण करणे गरजेचे आहे, आपल्या मातीत नेमके किती अन्नद्रव्ये आहेत मग इच्छीत उत्पादना साठी किती घटक द्यायचे ते ठरविने सोपे जाते. अनेक वेळा असेही पहायला मिळते की जमिनीत भरपूर प्रमाणात अन्न घटक आहेत परंतु ते पिकास ऊचलताच येत नाहीत किंवा ते घटक अविघटनशिल असतात, 15-20 वर्षापूर्वी ही समस्या फारच क्वचित ठिकाणी असायची परंतु आत्ता अनेक ठिकाणी हिच फार मोठी समस्या तयार झाली आहे. याची कारणेही अनेक आहेत माझ्या मते मोठे कारण जमिनीत वाढलेले अतिरिक्त व अविद्राव्य क्षार, खर तर भरपूर व नियमित हंगामी पाऊस पडल्यास हे क्षार जमिनीतुन निचर्यावाटे धुवून जायला हवेत (लिचआऊट) परंतु जमिनीत सेंद्रिय कार्बनच्या कमतरते मुळे व उपयुक्त जिवांणू च्या कमी संख्येमुळे जमिनी कडक व चिकट बनत चालल्या आहेत व मातीत क्षारांचे प्रमाण  हे वाढतच चालले आहे. जमिनीची विद्युत वाहकता (ई.सी.) वाढत चालली आहे. आपण पाठीमागील भागात पाहिल आहे द्राक्ष वेलीची पाने  सुर्यप्रकाश,  कार्बनडायऑक्साईड व पाणी यांच्या मदतिने स्वतःचे अन्न तयार करते, व वनस्पती ही प्रक्रिया करत असताना जमिनीतील घटक (एनपीके, सुक्ष्म व अतिसुक्ष्म) वनस्पती ला मदत करत असतात, (जमिनीतुन पुरवठा होत असलेल्या अन्नघटकांची वनस्पती ना तिच्या वेगवेगळ्या अवस्थां मधे सतत गरज असते) ईथेच एक परिणाम कारक घटना घडत असते , वनस्पती जो स्वतःसाठी अन्नसाठा तयार करत असते या प्रक्रियेत पानात, शेंड्यात व खोडात ऊर्जा तयार होत असते या ऊर्जेवर धनभाराचा प्रभाव जास्त असतो  (पॉझिटीव्ह चार्ज) हीच ऊर्जा पुढे मुख्य उत्पादनात बदलते. एका ठराविक अवस्थेनंतर ही ऊर्जा (विश्रांती काळ संपणे व ताण देण्याच्या अगोदर) वेलीच्या आंतरगत भागात साठवनुक करणे गरजेचे असते पण याच काळात जमिनीत निगेटिव्ह चार्ज सक्रिय असतो, व झाडातील बरिचशी धनभारित ऊर्जा जमिनीत निघुन जाते. (द्राक्षा पेक्षा इतर फळ पिकात ही समस्या जास्त आढळून येते आहे) सहज विद्युत वाहक धातुजन्य घटक मुळांच्या जवळ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात साठल्यामुळे च द्राक्ष वेलीत कमी प्रमाणात अन्न साठा शिल्लक रहातो,  आणि मग तिथुनच द्राक्ष बागांची कसरत चालू होते. फुट एकसारखी न होने, वांझ फुटींची संख्या वाढने,  घड जिरने किंवा रोग किडी बळावने या सारख्या कुठल्या ना कुठल्या प्रकारात द्राक्ष वेल  बळी पडत रहाते. यावर एकच ऊपाय आहे आणि तो म्हणजे माती समृद्ध करणे. "समृद्ध माती तरच शेती" भविष्यात द्राक्ष बागांसमोर हेच एक आव्हान असनार आहे.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्     

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ७

द्राक्ष बागेची ऑक्टोबर छाटणी पुर्वी माती परिक्षण करणे हे फार महत्वाचे असते, जमिनीत  असनार्या विविध घटकांचे प्रमाण समजू शकते, माती परिक्षण अहवाला मधे पहिला घटक जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच पीएच,  ऊत्तम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा पीएच सहा ते  साडेसात च्या दरम्यान  (6-7.5) असावा, परंतु अलिकडे अनेक द्राक्ष जमिनी या जास्त पीएच ने ग्रासलेल्या पहायला मिळतात,  काही ठिकाणी तर चुनखडीचे प्रमाण  जास्त असलेल्या जमिनीतही द्राक्ष बागांच्या लागवडी केल्या गेल्या आहेत, अश्या जमिनीत साहजिकच चुन्याचे प्रमाण जास्त असते तेथिल माती अतिविम्ल  (अल्कली) प्रकारात मोडते अशा जमिनीचा पीएच साडेसात ते नऊ पर्यंत असतो,  अशा जमिनीत द्राक्ष वेलीची वाढ समाधान कारक होत नाही व पुढे घड फुगवन सुद्धा अपेक्षित होत नाही, अती चुना किंवा कॅल्शियम चे अती प्रमाण असलेल्या द्राक्ष मुळांवर (सुरवाती पासूनच)  निगेटिव्ह चार्ज कमी प्रमाणात असतो, साहजिकच अश्या जमिनीत बरिचशी अन्नद्रव्ये द्राक्ष वेल ऊचलु शकत नाही, गंधक , मॅग्नेशियम,  पोटॅशियम, फेरस सारखे घटक जास्त प्रमाणात देऊनही या घटकांची ऊचल (अपटेकिंग) होत नाही.   ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण बिलकुल नाही किंवा अत्यल्प आहे अशाही जमिनीचा पीएच वाढलेला आढळत आहे, याचे कारण अति क्षारयुक पाणी व गरजेपेक्षा जास्त प्रमाणात रसायनांचा वापर हेच आहे, अशा जमिनीत माती मध्ये सोडीयम, क्लोराईड, फ्लुओराईड्स, लेड, अर्सेनिक, मर्क्युरी,ब्रोमाईड, कॅल्शियम व नायट्रेट  सारखे अनेक घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आढळून येत आहेत, या दोन्ही प्रकारच्या जमिनीत मात्र पीएच  वाढलाच जातो,  (इंदापूर तालुक्यात एका द्राक्ष बागेत जमिनीचा प्रकार ऊत्तम असुनही (चुनखडी नसलेली) माती परिक्षणात मातीचा पीएच 10 आढळून आला? ) मग अश्या जमिनीमधे अनेक समश्या तयार होतात, अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यामुळे तेथिल द्राक्ष वेलींच्या मुळांवर  निगेटिव्ह चार्ज गरजे पेक्षा जास्त वाढतो व जमिन चिकट व कडक बनते,  पीएच सुद्धा साडेसात च्या पुढे जातो एकूणच जमिनीचे आरोग्य बिघडते, जमिनीत कडकपणा व चिकटपणा वाढल्या मुळे तेथिल जमिनीचा पाण्याचा निचरा कमी होतो केवळ या कारणामुळे मातीत वाढलेले अतिरिक्त क्षार जमिनीच्या बाहेर पडत नाहीत, ज्या भागात थेट नदी किंवा कॅनाल चे पाणी शेतीसाठी वापरले जाते अशा जमिनीत पीएच प्रमाण वाढलेले निदर्शनास येत आहे,  महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नद्यातील पाणी प्रदुर्शीत झालेले  आहे. याच पाण्यातुन मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे रासायनिक क्षार जमिनी येत आहेत, अनेक  जमिनी तर क्षारपड (बरबाद) झाल्या आहेत , द्राक्ष वेल ही याच गुंत्यात अडकत चालली आहे, परंतु कितीही किचकट गुंता असला तरीही तो गुंता सोडवण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नसनार आहे. एखादा महामार्ग जर छराब झाला असेल त्यावर खुपच खड्डे पडले असतील तर तात्पुरते दुसर्या मार्गाने जाणे हा तात्पुरता पर्याय झाला, परंतु जागा न बदलता तोच महामार्ग नविन बनवला तर तो शाश्वत ऊपाय ठरतो,  अगदी तसच शेतीमधे कितीही समस्या तयार झाल्या तरीही शेती करने सोडून देने हा काही  त्यावर ऊपाय नाही , आपली शेती करण्याची पद्धत  नक्कीच आपण बदलु शकतो.  म्हणुनच आपण पुढील भागांमधे " समृद्ध माती तरच शेती " या अभियानाला सुरवात करणार आहोत. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ८

द्राक्ष शेती मध्ये  भविष्यात  माती चे आरोग्य शाश्वत व समृद्ध ठेवणे  हेच फार मोठे आव्हान असणार आहे. मागील भागात आपण  थोडक्यात पाहिले मातीचा पीएच व क्षारता वाढण्याची कारणे व द्राक्ष वेलीवर होणारा दुष्परिणाम काय होतो , यावर सद्ध्या तर एकच ऊपाय आहे तो म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक कार्बन) वाढविने हाच आहे . माती परिक्षण अहवालामधे  सेंद्रिय कार्बन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, मातीचा नमुना परिक्षण झाल्यानंतर सेंद्रिय कर्बाची वर्गवारी पुढील प्रमाणे केली जाते,  0 ते 0.30 - कमी, 0.30 ते 0.50 - मध्यम व 0.50 ते 1.0 चांगला, (अनेक कृषी तज्ञ व नामवंत अभ्यासक मंडळी सांगतात की  0.80 च्या आसपास सेंद्रिय कर्ब असेल तर ठिक आहे चांगला आहे)
काही  दिवसांपूर्वी एका गुजराती शेतकरी मित्राने त्याच्या शेतातल्या  मातीचा नमुना थेट अमेरिकेतील प्रख्यात मृदा प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवला. त्या अहवालामधे भारतीय शेतीसाठी सेंद्रिय कार्बन ची वर्गवारी अशी केली होती,  0.80 च्या खाली अत्यंत कमी- 0.80 ते 1.50 मध्यम व 1.50  ते 3.0 पासून पुडे ऊत्तम. आम्ही सेंद्रिय कार्बन ला का एवढे महत्व देत नाही याचच फार नवलही वाटत आहे वाईटही वाटत आहे, सेंद्रिय कार्बन चे महत्व आम्हाला चांगलेच माहीत आहे, परंतु  ही बाब  शेतकरीवर्गाने व शेतीतज्ञांकडून हवी तेवढी गांभिर्याने घेतली जात नाही, जमिनीची सुपिकताच मुळी सर्वस्वी सेंद्रिय कर्बावर अवलंबून आहे. जमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक  गुणधर्म हे केवळ सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त होतात. जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढल्याने सुपिकता आणि पिक उत्पादकता शाश्वत ठेवली जाते. जमिन ही भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांनी युक्त असे सजीव माध्यम आहे. अशी जमिन सर्वच वनस्पती ना आधाराबरोबरच योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी आणि आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करते, सेंद्रिय कार्बन चे  एवढ महत्व आम्हाला माहीत असुनही आमच्याकडे मात्र या बाबतीत फारच उदिसिनता पहायला मिळते, गेली तीन चार वर्षात द्राक्ष पिकविनार्या  विभागातील अनेक जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चक्क 0.30 च्या खाली  (जवळपास 50% जमिनी) आलेले आहेत, (हे फारच गंभिर आहे, वाळवंटाची व्याख्या करताना तज्ञ मंडळी सांगतात की ज्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन 0.50 टक्के च्या खाली असल्यास  त्या जमिनीला वाळवंट म्हणतात ? ) आणि या विषयाशी अनभिज्ञ असनारे आमचे द्राक्ष बागाईतदार शेतकरी बंधू  प्रत्येक ऑक्टोबर छाटणी च्या पुर्वी  एका नव्या ऊमेदिने कामाला लागतात, चला आता या वर्षी तरी आपली द्राक्ष विक्रमी दर्जाची अन विक्रमी टनेजची निघतील. प्रत्येक शेतकरी बंधूने आता तरी कृषी साक्षर होणे गरजेचे आहे, मातीचा कस टिकवून ठेवण्यासाठी काय करावे लागेल ते केले पाहिजे, कारण माती समृद्ध असली तरच शेती टिकणार आहे व पिकणार आहे. माती च्या सेंद्रिय कार्बन वरच जमिनीचा जिवंतपणा अवलंबून आहे. सेंद्रिय कार्बन कमी होण्याचे एक मोठे कारण म्हणजे शेतीत सेंद्रिय निविष्ठांचा कमी वापर,  पिकांचे अवशेष नष्ट करने, अतिरिक्त नत्र युक्त खंताचा वारंवार वापर करणे विनाकारण जमिनीत अनेक प्रकारची घातक रसायने सोडने व विविध रसायनांमुळे प्रदुर्शित झालेले पाणी साठे हेच पाणी शेतीसाठी वापरले जाते, याच कारणांमुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. हा सेंद्रिय कार्बन वाढवण्या साठी जमिनीमधे नियमित ऊत्तम कुजलेले शेनखत,  गांढूळ खत,हिरवळीची खते , जिवाणू खंतांचा वापर करावा लागेल.  पिकांच्या शिल्लक अवशेषांचा पुनर्वापर करावा लागेल तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा जमिनीवर आच्छादना साठी वापर करावा लागेल. जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक असल्यास अशा जमिनीत विविध ऊपयोगी जिवाणू व गांढूळ संख्या वाढेल व जमिनी सतत  पोकळ व सछिद्र राहील, जमिनीत ऑक्सिजन व पाण्याचे समतोल प्रमाण ही रहाते, द्राक्ष वेलीची मुळे अश्या जमिनीत अफाट कार्यक्षम रहातात व अशीच सेंद्रिय कर्ब भरपूर असलेली जमिनच द्राक्ष वेलीच्या मुळावरील निगेटिव्ह चार्ज व पाॅजिटिव्ह चार्ज स्वतःच्या नियंत्रणात ठेवते, कोनत्या वेळी कोनता भार कमी वा जास्त ठेऊन वेलीस योग्य वेळी उत्पादना साठी सक्रिय करायचे हे फक्त सुपिक  जमिनीच्या च नियंत्रणात असते, म्हणून च या पुढे शाश्वत शेती टिकवण्या साठी " समृद्ध माती तरच शेती " ही संकल्पना राबवावी लागणार आहे. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ९ 

जमिनीची सुपिकता ही सेंद्रिय कार्बन वर बरिचशी अवलंबून आहे हे आपण समजून घेतले आहे, अत्यंत वेगवान पद्धतीने सेंद्रिय कार्बन चे प्रमाण कसे वाढविता येईल ते आपण आता पाहणार आहोत, सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रयोगात भरपूर कार्बनिक पदार्थ (सेंद्रिय  घटक) जमिनीत मिसळून टाकने गरजेचे आहे, (या घटकांमधे भरपूर विविध प्रकारचे  जिवाणू असतात) हे सेंद्रिय घटक जमिनीत मिसळल्या नंतर मात्र जमिनीची  फारशी कोणत्याही प्रकारची मशागत करू नये आणि मग त्याच जमिनीच्या पृष्ठभागावर एक सारखे सेंद्रिय  पाला पाचोळा, पिकांचे अवशेष, थोडेसे काष्ठयुक (मका ची धांडे, तुराट्या , कपाशीच्या काड्या किंवा इतर  घटक) तण वैगरेचे आच्छादन (मल्चिंग) करून घ्यावे, आता मातीत मिसळलेले सेंद्रिय घटक जिवाणूंच्या मदतिने कुजण्याची प्रक्रिया चालु करतिल (सडण्याची नव्हे). या कुजन्याच्या प्रक्रिये दरम्यान तयार झालेली उष्णता सेंद्रिय आच्छादना मुळे नियंत्रणात ठेवली जाईल,  ईथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे,  बिगर आच्छादित सेंद्रिय घटक कुजण्याच्या प्रक्रियेत तयार झालेली ऊर्जा नियंत्रित रहात नाही या ऊर्जे पासून मुख्य पिकांची मुळे दुर पळतात, शिवाय या ऊर्जे मुळे काही नैसर्गिक अन्नघटकांचा र्हास होतो, कारण ऊर्जा म्हणजे च ऊष्णता किंवा अग्नी होय, आणि ऊर्जा कुठपर्यंत टिकते तर जो पर्यंत या ऊर्जे ला इंधन पुरवठा होतो तो पर्यंत ही ऊर्जा  टिकून रहाते, नेमके ईथेही असेच घडते, जमिनीत सेंद्रिय घटकांची कुजण्याच्या प्रक्रियेत  (विना आच्छादित) मुळताच जमिनीत असलेले नायट्रोजन,  ऑक्सिजन हे घटक इंधनाचे काम करतात,  यातून तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड हवेत उडून जातो (यालाच म्हणतात तेलही गेले अन तुपही गेले,  हाती आले...) परंतु  जर याच स्थितीला जमिनीवर परत सेंद्रिय घटकांचे आच्छादन असेल तर नेमके याच्या ऊलटे घडते, जमिनीत ऊर्जा अल्प प्रमाणातच तयार होते, नत्र ऑक्सिजन जे फारसे ज्वलन होत नाही, मोठ्या प्रमाणात तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड आच्छादना मुळे अडून जमिनीतच मुरतो, या शिवाय याच वेळी त्या जमिनीत असणारे पिक प्रकाशसंश्लेषन वेगाने करते,  व जमिनीत कार्बन डाय ऑक्साईड चे मुरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीत असणार्या सेंद्रिय घटकांचे ह्युमस मध्ये रूपांतर होते. (हे नेमके कसे घडते याचे ऊत्तम ऊदाहरण च सांगतो, चांगली वाळलेली लाकडे व गोवर्या  होळी सणाला आपल्याकडे आणून जमिनीच्या वर व हवेच्या सानिध्यात पेटविली जातात दुसर्या दिवसी जाऊन पाहिले तर सगळ्या ची राख झालेली असते,  या राखेत ऊर्जा शिल्लक राहत नाही,  आता हिच लाकडे जमिनी खाली भट्टीत जाळली तर या लाकडांची  राख न बनता ऊत्तम लोणारी कोळसा तयार होतो, या कोळश्यात भरपूर ऊर्जा शिल्लक राहिलेली असते) हाच ह्युमस पुढे जमिनीत असणार्या जिवाणूंना व पिकाला नवसंजीवनी प्राप्त करून देतो. हाच जमिनीत स्थिरावलेला कार्बन पिकाना हवि तशी ऊर्जा पुरवत राहतो, या सगळ्या प्रक्रियेत मातीत असणारे जिवाणू मात्र महत्वाची कार्ये सांभाळत असतात , हे जिवाणू फक्त सेंद्रिय घटकांना कुजविने एवडच कार्य करत नाहीत तर मातित असणारी विविध  प्रकारची खनिजे पिकांना सहज ऊपलब्ध करून देत असतात, हे विविध जिवाणू नेमके काय काय करतात हे आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु सेंद्रिय कर्ब वाढविणे हे अतिशय महत्वाचे असणार आहे, जमिनीत तयार झालेला ह्युमस ( ह्युमिक अॅसिड नव्हे ) हाच द्राक्ष वेलींच्या मुळांवर असणारा निगेटिव्ह चार्ज नियंत्रित करू शकतो हे आता आपल्याला समजु शकेन.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग  १०

सेंद्रिय कार्बन जमिनीत तयार होणे हे सेंद्रिय घटकांच्या मदती  शिवाय तयार होणे जवळपास अशक्यच आहे. नैसर्गिक रित्या जमिनीत सेंद्रिय कार्बन व ह्युमस निर्मिती मध्ये विविध जिवाणूं चा फार मोठा वाटा आहे, सेंद्रिय घटकांना कुजण्याच्या प्रक्रियेत एकच कुठला विशिष्ट जिवाणू च नव्हे तर असंख्य प्रकारचे जिवाणू एकाच वेळी हे कार्य पार पाडत असतात, एखादा सेंद्रिय पदार्थ  कुजविने म्हणजेच विघटीत करणे, (सडविण्याची  प्रक्रिया थोडी भिन्न असते, याही प्रक्रियेत जिवाणू च काम करतात) कुजविण्याच्या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन,  नायट्रोजन  सारखे वायू  वापरले जातात व तयारही होतात तर सडविण्याच्या प्रक्रियेत अमोनिया, मिथेन, सल्फर, ओझोन सारखे विषारी वायु तयार होत असतात. कुजण्याची प्रक्रिया ऊघड्या हवेत किंवा हवायुक्त ठिकाणी चांगली होते परंतु हिच प्रक्रिया  हवाबंद अवस्थेत केली तर तिथे कुजण्या ऐवजी सडण्याची (फर्मेंटेशन) प्रक्रिया  चालू होते. आता आपण द्राक्ष बागेकडे वळुया, द्राक्ष बागेत प्रत्येक बहारा पुर्वी जमिनीत  सेंद्रिय घटक टाकले होते जातात,  यात सर्वात मोठा घटक म्हणजे शेनखत, बहुसंख्य शेतकरी द्राक्ष वेलीच्या खोडाजवळ किंवा दिड दोन फुट अंतरावर खड्डे घेऊन त्यात टाकून मातीने बुजवुन घेतात, बर्याचदा हे शेनखत कच्चेच म्हणजे पुर्ण न कुजलेलेच असते, जमिनीत गाडले गेल्यानंतर तिथे पुढील कुजण्याची प्रक्रिया चालू होते,  या कुजन्याच्या प्रक्रियेत प्रचंड ऊष्णता तयार होते, (प्रसंगी 50 ते 65 अंश डिग्री सेल्सियस)  शिवाय ही प्रक्रिया  द्राक्ष मुळी जवळच चालु असते, ऐवढ्या ऊष्णतेचा मुळीवर विपरित परिणाम होतो, कारण जमिनीत मुळे व मुळांची बाह्य त्वचा फारच नाजूक असते त्यामुळे मुळाना एक प्रकारचा झटका बसतो, या शिवाय शेनखत कुजताना तयार होणारी ऊर्जा (ऊष्णता) ही कुणाला तरी स्वतःचे इंधन बनविते, शेनखत हे इंघन नाही  तर माघ्यम म्हणुन काम करत असते व जमिनीत असनारे ऑक्सिजन व नायट्रोजन हे इंघन म्हणून खर्ची पडत असतात, (ऑक्सिजन जास्त जळतो व नायट्रोजन थोडा कमी जळतो) केवळ या प्रकाराने द्राक्ष वेलीवर पुढे अनेक प्रकारच्या अन्नद्रव्ये कमतरते मुळे नुकसानच संभवते,  जमिनीत  नायट्रोजन कमी पडले म्हणजे फक्त नत्राची कमतरताच नाही तर इतरही अनेक अन्नद्रव्य नायट्रोजन शिवाय मुळीकडून उचलली जात नाहीत . (केवळ  याच कारणामुळे हिरवळीची खते ताग ढेंच्या सारखी पिके हिरवी ओली असतानाच जमिनीत गाडली गेल्यानंतर पुढील लगेचच घेणार्या पिकात नत्राची प्रचंड कमतरता तयार होते). अनेक वेळेस द्राक्ष वेलीस इतर सर्वच दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपुर देऊनही केवळ त्या घटकाना घेऊन जाणारा नायट्रोजन घटक कमी किंवा नसल्यामुळे सुद्धा द्राक्ष वेलीत या घटकांची कमतरता जानवते, या शिवाय मातीमधे ऑक्सिजन व नायट्रोजन च्या कमतरते मुळे जमिनीत ह्युमस ची निर्मिती सुद्धा मंदावते. म्हणून द्राक्ष बागेत शेनखत देताना ते एकतर शंभर टक्के पहिलेच कुजलेले (कंपोष्ट) असावे व तसे ऊपलब्ध नसल्यास असे खत जमिनीत न गाडता मातीच्या वरच्या थरात संपूर्ण बेडवर एकसारखे पसरून किंवा विस्कटून द्यावे व नंतर त्यावर  थोडेफार आच्छादन करून घ्यावे. इतर रासायनिक खते टाकायचीच झाल्यास सुपर फाॅस्फेट सोडून इतर खते शेनखत किंवा कंपोष्ट खतात मिसळू नयेत. ती स्वंतत्र टाकावित. 

आता आपण थोडा वेगळा विचार करून पाहू, शेनखत किंवा सेंद्रिय घटका सोबत कुजण्याच्या प्रक्रियेसाठी नत्र युक्त रासायनिक खते युरिया,  अमोनियम नायट्रेट सारखे खत दिल्यावर काय घडते ते पाहू, आपण सुरवातीलाच पाहिले की कुजण्याच्या प्रक्रियेत ऑक्सिजन व नायट्रोजन इंधनाचे काम करतात, पण नायट्रोजन कमी जळतो. या मिस्रणाने (शेनखत व युरिया) कुजण्याची प्रक्रिया आणखी जलद घडत राहते, व नत्र युक्त खतांचे रूपांतर नायट्रेट व अमोनिकल नायट्रेट मधे लवकर होते. कुजण्याच्या प्रक्रियेला कमी वेळ मिळाल्या मुळे इतर अन्नद्रव्ये (नत्र सोडून इतर) लवकर विघटीत होत नाहीत, त्यामुळे एकटे नायट्रेट मुळीवाटे जास्त प्रमाणात शोषले जाते, (हे म्हणजे वरातीच्या पुढे घोडे असच काहीस आहे , नायट्रेट म्हणजे घोडा व वरात म्हणजे इतर अन्नद्रव्ये) एकटे नायट्रेट फारच उपद्व्याप करून ठेवते. एकतर द्राक्ष वेलीचा शेंडा पळवते किंवा घडाची गर्भधारणा मोडित काढते दुसरे   वेलिची प्रतिकार क्षमता व काटकपणा कमी करते, म्हणून  सेंद्रिय घटकांच्या सोबत एकत्र रासायनिक खते देऊ नयेत किंवा अत्यल्प द्यावित, (खरड छाटणी वेळेस चालेल) हे नायट्रेट मुळे कमजोर असतानाही वेगवान हालचाली करून वेलीत प्रवेश मिळविते , अर्थात हालचाल नायट्रेट करत नाही तर मुळावरील जास्तीचा पडलेला निगेटिव्ह चार्ज चा भार हे सगळे घडवुन आणत असतो तो कसा व का भार वाढतो हे आपण मागील काही भागात समजून घेतले असेलच.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ११

जमिनीत सेंद्रिय कार्बन जसा महत्वाचा असतो  अगदी तसेच मातीला समृध्द करण्यामध्ये सूक्ष्म जीवाणू  फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात . आजच्या भागात आपण या सूक्ष्म जीवाणूचे नेमके कार्य कसे चालते हे पाहणार आहोत .
अझोटोबॅक्टर, अझोस्पिरीलम, अॅसेटोबॅक्टर हे जीवाणू जमिनीत मुक्तपणे राहून नत्रवायुचे जमिनीत स्थिरीकरण करतात. रायझोबियम जीवाणू कडधान्य पिकाशी सहजीवी नाते प्रस्थापित करतात. पिकांच्या मुळांतील गाठींत राहून मुक्त नत्र शोषून स्थितीकरण करतात. हे जीवाणू नत्रवायूचे रुपांतर अनोमियात करतात. अनोमियापासून नत्राची अन्य संयुगे तयार होऊन ती झाडांना उपलब्ध होतात. या प्रक्रियेला नत्र स्थितीकरण म्हणतात.
बॅसिलम व स्युडोमोनासच्या विविध प्रजाती मातीच्या कणांवर स्थिर झालेल्या व उपलब्ध नसणाऱ्या स्फुरदाचे विघटन करतात. त्याचे पाण्यात विरघळू शकणाऱ्या द्राव्य स्वरुपात रुपांतर करतात. स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंकडून काही विशिष्ट प्रकारची आम्ले उत्सर्जित होतात.अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाबरोबर ती संयोग पावतात. त्याचे रुपांतर विद्राव्य (उपलब्ध) स्वरुपात करतात.
मायकोरायझा ही बुरशी पिकांच्या मुळांसोबत सहयोगी पद्धतीने स्फुरद, जस्त यांसारख्या अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध करून देते. कमी सुपीकतेच्या जमिनीतून फॅास्फेट तसेच जमिनीच्या खोल थरातील पाणी शोषून पिकास पुरविते.
जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील गंधकाचे विघटन करून सल्फेट या स्वरुपात रुपांतरीत करण्याचे काम थायोबॅसिलस या जीवाणूंकडून होते. बॅसिलस व सुडोमोनासच्या काही प्रजाती जस्त, लोह, तांबे व कोबाल्ट आदी अन्नद्रव्ये विरघळविण्याचे काम करतात.
फेरोबॅक्टेरीयम, लीप्तोथ्रीक्स हे जीवाणू जमिनीत असलेल्या पालाशची हालचाल वाढवून पिकास तो उपलब्ध करून देतात.   जमिनीतील सूक्ष्मजीव सेंद्रिय पादार्थ कुजविण्याचे काम करतात, त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या सुक्ष्मजीवांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जमिनीत वापरलेले सेंद्रिय पदार्थ जमिनीतील वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या प्रभावाखाली कुजविण्याच्या प्रक्रियेत येतात. त्यायोगे सेंद्रिय पदार्थांमध्ये बंदिस्त वनस्पतीची पोषकद्रव्ये जमिनीमध्ये सोडली जातात. ती पिकांना सहज उपलब्ध होतात. 
मूळ कुजणे, खोड सडणे, पानगळ, झाडे वाळणे आदी रोगांना हानिकारक बुरशी कारणीभूत असतात. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी ट्रायकोडर्मासारखी बुरशी उपयुक्त ठरते. काही सूक्ष्मजीव पिकांच्या मुळाभोवती रोगकारक बुरशींना घातक प्रतीजैविके उत्सर्जित करतात. स्युडोमोनस फ्लोरेसेन्स हा जीवाणू पिकाच्या मुळाभोवती किंवा मुळावर सक्रीय राहून काही बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण करते.
अॅक्टनोमायसेटस व बुरशी हे सूक्ष्मजीव त्यांच्या शरीरातून चिकट डिंकासारखा पदार्थ उत्सर्जित करतात,  त्यामुळे मातीचे कण एकत्रित घट्ट ठेवले जातात.त्यामुळे मातीचे संयुक्त कण निर्माण होऊन धूप कमी होण्यास मदत होते.
अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरीलम व अन्य सूक्ष्मजीव पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जीबरेलिक अॅसिड, व्हिटॅमिन-१२, इंडोल अॅसिटीक आम्ल, निकोटिनिक आम्ल, पेंटोथेनिक आम्ल, कोलिक आम्ल, बँयोटीन...
जमिनीत अतिक्षारामुळे पिकवाढीवर तसेच जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीवर व त्यांच्या जैविक क्रीयेवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीतही काही सूक्ष्मजीव तग धरून आपले कार्य चालू ठेवतात, सेंद्रिय आम्ल उत्सर्जित करतात.त्यामुळे चुनखडी विरघळून चुना मुक्त होतो. मातीच्या कणावर असलेल्या सोडीयमची जागा घेतो. अशा तऱ्हेने सोडियम क्षाराचे प्रमाण कमी होऊन चोपण जमिनीची सुधारणा होते.
रायझोबियम जीवाणूंमुळे कडधान्यांच्या मुळांवर गाठी निर्माण होतात, त्यामुळे मुक्त नत्राचे मोठ्या प्रमाणावर स्थिरीकरण होते, त्यामुळे कडधान्याला नत्र खते कमी प्रमाणात लागतात. नत्र स्थिर करणारे व मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या जीवणूंतील गुणसूत्रे अॅग्रो बॅक्टेरीयमच्या उपयुक्त जीवणूंमध्ये सोडून त्याच्या वापराने तृणधान्य पिकाच्या मुळांवरही गाठी निर्माण करता येतात.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १२

सेंद्रिय कार्बन निर्मिती मधे सेंद्रिय घटक व विविध जिवाणू या दोन घटकांच्या संयोगाची गरज असते.  या शिवाय त्या ठिकाणच्या भौतिक परिस्थितीची ही एक विशिष्ट अवस्था ही असावी लागते, सेंद्रिय कार्बन तयार होत असताना ऑक्सिजन चा  इंधन म्हणून उपयोग होत असतो, जमिनीत सेंद्रिय कार्बन चांगला म्हणजे एक टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास मातीचे तपमान संतुलित राहते, ज्या जमिनीत हाच सेंद्रिय कार्बन कमी (0.5 % पेक्षा कमी) असल्यास हवेतील तपमान जमिनीवर प्रभाव पाडत असते, अश्या जमिनी थंड हवामानात वेगाने हवेतील तपमानाला समकक्ष होतात व जास्त तापमानात लवकर तापतात. या ऊलट जमिनीत  भरपूर ( 1% च्या आसपास किंवा जास्त) असताना हवेतील कमी किंवा जास्त तपमानाचा जमिनीवर लवकर परिणाम होत नाही. द्राक्ष वेलीच्या चांगली वाढ व विकासासाठी 15 ते 35 अंश डिग्री सेल्सियस तपमान चांगले मानवते, 35 पेक्षा जास्त तपमानाचा द्राक्ष वेलीची  वाढ मंदावते, मुळे अन्नद्रव्ये व पाणी ऊचलण्यास कमी पडतात व 15 डिग्री पेक्षा ही तसेच परिणाम वेलीवर होतात,  परंतु हेच तपमान जर 15 डिग्री पेक्षा फारच कमी म्हणजे  12-11-10 किंवा 10 च्या खाली आल्यावर मात्र द्राक्ष वेलीवर विपरित परिणाम होऊ लागतात, अतिशय कमी तापमानामुळे द्राक्ष पाने कडक व वाकडी होतात प्रसंगी पानांच्या कडा करपतात व घड अवस्था असताना घडांचा विकास थांबतो. मण्यावरिल बाह्य  त्वचेच्या पेशी आकसतात व घडामधा कडकपणा येतो, अनेकदा ऊशिरा फळछाटणी च्या बागांमधे घड सेटिंग अवस्था येते व तापमान  प्रचंड घसरते (15 डिग्री पेक्षा कमी ) अश्या वेळी हमखास घडामधे कडकपणा जानवतो, परंतु याच वेळी जमिनीत सेंद्रिय कार्बन भरपूर असल्यास वेलींच्या मुळावर निगेटिव्ह चार्ज सक्रिय ठेवायचे काम हाच सेंद्रिय कार्बन करत असतो व स्वाभाविकच मुळांचे तपमान हवेतील तापमानापेक्षा  जास्त राहते व त्याही अवस्थेत द्राक्ष वेलीची मुळे कार्यक्षम राहतात व घडाना ऊर्जा पुरवतात परिणाम घडावरील मणी व देठ फारसे कडक होत नाहीत. तथापि द्राक्ष घडात  कडकपणा येण्याचे कमी तपमान हे एकच कारण नसते,  मोहोर फुलोरा  अवस्थेत कॅल्शियम, झिंक व पोटॅशियम या घटकांची कमतरता ही घड कडक बनविण्यास कारणीभूत  असते, जमिन चुनखडीयुक असल्यास याच काळात मॅग्नेशियम, फेरस ची विशेष कमतरता जानवते, काही वेळेस फुलोरा अवस्था येण्यापूर्वी जिए चा वापर दहा पीपीएम पेक्षा जास्त झाल्यास हमखास झिंक द्रव्याची कमतरता येते व घड जिरने, बाळी पडने व वाचलेल्या घडामघे कडकपणा हमखास येतो, कॅल्शियम च्या अतीवापराने  सुद्धा घड कडक बनतात या शिवाय फवारणी चे  पाणी अती क्षारयुक व जास्त पिएच चे सतत वापरले असल्यासही घडाना कडकपणा येतो, शक्यतो फवारणी चे पाणी विहिरीचे वापरावे, बोअर व सरळ कॅनाॅलचे पाणी जास्त क्षारयुक असते, जास्त पिएच साठी पिएच बॅलंसर सारखे घटक वापरावेत,पाणाचा पिएच कमी करण्यासाठी  सतत सायट्रिक अॅसिडचा  वापरही मण्यांना कडक बनवते, काही वेळेस बागेस पाण्याचा वापर एकसारखा न होता कमी जास्त होतो त्याही परिस्थितीत घडाना कडकपणा येऊ शकतो, कोनत्याही कारणामुळे  घडाना आलेला कडकपणा कमी करण्यासाठी एसव्हि किटोन चा द्राक्ष बागेत वापर करणे अतिशय फायदेशीर ठरले आहे, यातील नैसर्गिक अमिनो आम्ल, नैसर्गिक जिबरेलन्स व नैसर्गिक सायटोकायनिन्स ची संयुगे अतिशय खुबिने द्राक्ष बागेत काम करतात, घड सेटिंग नंतर घडांना कडक होण्यापासून वाचवितात. एसव्हि किटोन फवारणी नंतर अतिशय कमी वेळात घड नरम व कुरकुरीत अवस्थेत टिकून राहतात. जास्त थंडीच्या वातावरणात एकरी एक लिटर जमिनीतून दिल्यास ही ते घडाना सहसा कडक होण्यापासून वाचविते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १३

दर्जेदार द्राक्ष निर्मिती करणे ही  अनेक द्राक्ष उत्पादनकांची इच्छा असते. परंतु या अश्या निर्मिती साठी आपली जमिन समृद्ध असली पाहिजे हे विसरून चालणार नाही. अनेक शेतकरी बंधू हीच बाब रितसर विसरून जातात व जमिनीच्या आरोग्याचा विचार न करता मातीत नेमके काय हव हे पाहत नाहित व फक्त विविध रसायनांचा च वापर करून द्राक्ष उत्पादन घेतात, फक्त रसायनांच्या मदतिने ही द्राक्ष उत्पादन येते परंतु विषेश दर्जेदार द्राक्ष निर्मिती होत नाही. या साठी सर्वात पहिले जमिनीतील मृदा रसायनशास्त्र समजून घेने महत्वाचे आहे. पाठीमागील एका भागात आपण सेंद्रिय कार्बन कसा तयार होतो हे पाहिले आहे, याचे जमिनीत किती प्रमाण हवे तेही आपण पाहीले आहे, आता आपण या सेंद्रिय कार्बन  चे नेमके काम काय असते व तो कसा असतो हे पाहणार आहोत. सेंद्रिय कार्बन जमिनीत स्थिर झाल्यावरच त्याचे चे रुपांतरण ह्युमस मधे होते , ह्युमस हा एक काळपट रंगाचा व मेणचट पदार्थ असतो, या पदार्थाचे रासायनिक पृथ्थकरण केल्यास यात 60 % सेंद्रिय घटक व 6% नत्राचे प्रमाण सापडते, तसेच यात पाणी व एतरही अनेक खणीजे व संप्रेरके सापडतात, हे प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साईड व नायट्रोजन चेच एक संयुग तयार झालेले असते, याचे उत्कृष्ट  प्रमाण गुणोत्तर 10 : 1 असे समजतात. यालाच कर्ब नत्र गुणोत्तर किंवा सी एन रेशो असे म्हणतात. हा पदार्थ म्हणजे पिकाचे थेट अन्न असते  असा अनेकांचा समज आसतो,  परंतु ह्युमस हे वनस्पती चे अन्न बिलकूल नसते, वनस्पती ची मुळे या पदार्थाला कधिच स्विकारत नाही, नव्हे ते मुळीला ऊचलताच येत नाही. ह्युमस हा एक पौष्टिक असा प्रथिनजन्य पदार्थ आहे, त्यामुळे हा पदार्थ जमिनीत असणार्या असंख्य जिवाणूंचे खाद्य आहे, मातीतील विविध कामे करणारे जिवाणू हे अतिशय सुक्ष्म आकाराचे असतात व ते फक्त प्रथिनजन्य  पदार्थावरच जगतात व वेगाने वाढतात. (मुळताच मातीत हे जिवाणू पहिलेच नैसर्गिक असतात) जर जमिनीचा सेंद्रिय कार्बन 0.80 % किंवा त्यापेक्षा अघिक असल्यास हेच जिवाणू भयानक वेगाने वाढतात, वाढतात म्हणजे एकाचे दोन, दोनचे चार, चारचे आठ.. योग्य अनुकुलता मिळाल्यास एक जिवाणू एक महिण्यात स्वताची पुढिल पिढी ची संख्या एक कोटीच्या पुढे नेऊ शकतो, आता एका एकरात सगळे मिळून किती जिवाणू संख्या असते हे मात्र विचारू नका! (गणित च करता येनार नाही म्हणून अगणित) आता हेच जिवाणू काय काय काम करतात ते आपण पाठीमागील एका भागात पाहिल आहे, अनेक बागाईतदार शेतकर्याना असे वाटत असावे आपण पिकाला दिलेली वेगवेगळी खते, डिएपी, पोटॅश किंवा अलीकडील पाण्यात विरघळणारी रासायनिक खते शंभर टक्के पाण्यात विरघळली की पिकाची मुळे सरळ ऊचलत असतील परंतु कोनत्याच वनस्पती ची मुळे रासायनिक किंवा सेंद्रिय खतांना थेट कधिच ऊचलु शकत नाहीत, तर ही विविध  खते सुट्या सुट्या आयण कणांना च स्वतः ऊचलु शकतात, समजा आपण एखाद्या पिकाला कॅल्शियम नायट्रेट ( Ca(NO3)2 ) पाण्यात पुर्णपणे विरघळून दिले,  ते जमिनीत पोहोचल्या बरोबर मातीत असणारे अगणित जिवाणू या द्रव कणांवर लगेच प्रक्रिया करतात व कॅल्शियम चे व नायट्रेट चे वेगवेगळे आयन्स मुक्त करतात. मगच मुळे ते वेगवेगळ्या स्वरूपात ऊचलून घेतात व वर खोडाकडे पाठवतात, एकंदरीत वनस्पती ची मुळे स्वतःचे अन्न हे फक्त आयण च्याच स्वरुपात घेतात, शेतकरी एखादे कोनतेही रासायनिक खत दिल्यानंतर पिकावर या खताचा होणारा परिणाम दोन तिन किंवा काही दिवसातच पहायला मिळतो, या वरून कल्पना येईल की या काळात जमिनीत किती प्रचंड व वेगाने जिवाणूं ची हालचाल असेल, आणि हेच जिवाणू मात्र सेंद्रिय कार्बन वरच जगतात, या साठी जमिनीत विविध जिवाणूंची ऊपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे, व या जिवाणू ना जगण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कार्बन भरपूर असने हे फार महत्वाचे आहे. कोनतीच खते ही मुक्त आयण स्वरूपात नसतात, त्यावर जिवाणूं कडून प्रक्रिया च व्हावी लागते, पिकांची मुळे ही आपण जे कोनतेही सेंद्रिय अथवा रासायनिक खत दिले म्हणजे त्या खतांचे सर्वच आयन्स घेते असे नाही, तर पिकाला जे गरजेचे आयन्स हवे तेच ते ऊचलुन घेते. मग न घेतलेले आयन्स तसेच काही काळ जमिनीत साठून राहतात व पुढे दुसर्या कुठल्यातरी विजातीय आयन्स बरोबर संयोग होऊन नविन प्रकारचे संयुग तयार होते, असे पिकाकडून न स्विकारलेली व नैसर्गिक प्रक्रियेत तयार झालेली संयुगावस्थेतील संयुगे असंख्य प्रकारची असतात, यात बरीचशी संयुगे ही विकृत (विषारी व प्रचंड आम्लारी किंवा अल्कली युक्त) असतात,  यावर जिवाणू सुद्धा प्रक्रिया करू शकत नाहीत व अनेकदा जिवाणू मरतात किंवा या जिवाणूंची संख्या कमालीची घटते. द्राक्ष वेली च्या मुळांवर अशी ऊपलब्ध न होणारी संयुगे साठून राहतात व मुळांवर निगेटिव्ह चार्ज वाढवतात . हा निगेटिव्ह चार्ज वेलीच्या वाढीच्या (विश्रांती) काळात ठीक आहे परंतु फळाच्या वाढी वेळेस वेलीचे संतुलन बिघडवत असतो. या वरून आपणास समजले असेलच की द्राक्ष वेलीस कधि व कोनती खते किती द्यावित म्हणजे द्राक्ष वेलीवर कोनत्यावेळी कोनता चार्ज असायला हवा त्यानुसारच कोनती खते कधि व किती द्यावित हे नियोजन करणे सोपे होऊन जाईल. आपण पुढील काही भागात हेच पहाणार आहोत.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १४

आपण या पुर्वी  च्या काही भागात सेंद्रिय कर्ब व त्याची  जमिनीला व द्राक्ष वेलीस किती गरज आहे हे पाहिले आहे, उच्च प्रतीची द्राक्ष घड निर्मिती करण्यासाठी   अनेक घटक कारणीभूत असतात त्यातीलच विविध प्रकारची अन्नद्रव्ये लागतात,  प्रमुख अन्नद्रव्यामध्ये  नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक आहेत त्याच बरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक हे दुय्यम घटक व ईतरही अनेक सुक्ष्म अन्नद्रव्ये ही थोड्या अधिक प्रमाणात लागतात. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या  विविध  अवस्थांमधे वेगवेगळ्या अन्न घटकांची  गरज भासत असते . मुळांची चांगली वाढ होण्यासाठी स्फुरद लागते तर वेलीची शारिरीक वाढ  व शेंडा व काडीची निर्मिती करण्यासाठी नत्र + स्फुरदाची गरज असते व घडांचा विकास व वाढ होण्यासाठी नत्र + पालाश या घटकांची गरज नेहमी लागत असते. सर्वसाधारणपणे  थाॅमसन, शरद सिडलेस, ताश गणेश, सोनाका आदी जातींमधे हेक्टरी विस ते पंचवीस टन चांगल्या प्रतीच्या द्राक्ष घडांचे  उत्पादन मिळते, तथापी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जातीपरत्वे आपल्याला  किती उत्पादन घ्यायचे आहे त्यानुसारच किती  (अन्नद्रव्ये ) खते द्यावयाची आहेत ते ठरवावे लागते, आता आपण थोड्या वेगळ्या बाजूने विचार करूयात, द्राक्ष घडांचे शास्त्रीय पृथ्थकरण केल्यास असे  समजते की द्राक्ष मण्यांमधे एकूण वजनाच्या 84.5 % पाणी व 14.5 % घन पदार्थ आढळून येतात, याचा अर्थ असा की द्राक्ष मण्यांमधे पाणी सोडून 14.5 % घन पदार्थाची निर्मिती होणे गरजेचे आहे, व हे घन पदार्थ विविध प्रकारच्या अन्न घटकापासूनच तयार होत असतात (म्हणजे एकूण घन पदार्थाच्या वजना इतके खत देने असा अर्थ नाही) एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणी अश्या दोन वाढीच्या कालखंडात ही अन्नद्रव्ये पुरवठा करावी लागतात, या दोन्ही वेळेस मिळून द्यावयाची एकून  खंतापैकी एप्रिल छाटणी वेळेस आर्धे नत्र व आर्धे स्फुरद  द्यावे लागेल व बाकी आर्धे नत्र आर्धे स्फुरद व संपूर्ण पालाश हे ऑक्टोबर छाटणी वेळेस दिले पाहिजे, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर छाटणी पुर्वी एका द्राक्ष वेलीच्या संपूर्ण मुळासकट भट्टीत जाळून केलेल्या कोरड्या  राखेच्या वजना  इतकी एकूण अन्नद्रव्ये त्या वेलीस लागतात. मग आता कोनत्या बागेस किती अन्नद्रव्ये किंवा खते द्यायचे ते त्या  द्राक्ष बागेच्या वय व विस्तारावर अवलंबून राहील, या शिवाय जमिनीत पहिली किती अन्नद्रव्ये शिल्लक आहेत याचाही विचार करावा लागेल, या साठी ऑक्टोबर छाटणी पुर्वीच बागेतील माती व आपण बागेस नियमित देणारे पाणी या दोन्हीं ची प्रयोगशाळेत तपासणी करून घेने महत्वाचे ठरते. या पुर्वीच अनेक द्राक्ष तज्ञांनी बागेस एप्रिल व ऑक्टोबर वेळेस मिळून एन पि के  ची मात्रा किती द्यायची हे ठरवले आहे,  हेक्टरी 900 किलो नत्र, 500 किलो स्फुरद व 700 किलो पालाश एवढी या तिनच घटकांची मात्रा लागते, मग माती परिक्षणा मधे जमिनीत ऊपलब्ध एन पी के ची मात्रा किती आहे हे कळाल्या नंतर तेवढी मात्रा एकूण शिफारस केलेल्या मात्रेतून वजा करावी लागेल, या शिवाय बागेस  नियमित दिले जाणारे पाणी ही परिक्षण करून घेने महत्वाचे ठरेल,  कारण आता पाणीही पुर्वी सारखे स्वच्छ व सोज्वळ राहिलेले नाही,  विशेषत थेट नदी किंवा कॅनाॅलच्या ही पाण्यात नत्र, स्फुरद,  पालाश, कॅल्शियम, सोडीयम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक मुक्त आयन्स स्वरूपात व मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरच   नेमकी कोनती अन्नद्रव्ये किती प्रमाणात व कधी द्यावित, या सगळ्याचा विचार आपण पुढील भागात विचार करणार आहोत. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्    

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १५

शेतकरी बंधूनो ऊत्तम दर्जेदार द्राक्ष निर्मिती साठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर द्राक्ष बागेत सतत करावा लागेल, प्रत्येक वर्षी साधारणता एकरी 10 ते 12 टन सेंद्रिय खत द्राक्ष बागेस दिले जावे तथापी  एकाच प्रकारचे शेनखत किंवा कंपोष्ट संपूर्ण देण्यापेक्षा ऊत्तम कुजलेले शेनखत 40 % ,  हिरवळीचे खत 20%, प्रेसमड 10%, गांढूळ खत 10%, विविध प्रकारच्या सेंद्रिय पेंडी 10% , बाॅयलर पोल्ट्री खत 7 % व तयार भुसुधारक खत 3% हे सगळे घटक एकत्र करून एकाच वेळी देण्यापेक्षा दोन भागात दिल्यास अधिक फायदेशीर राहील, पैकी हिरवळीचे खत विश्रांती काळात दिलेले योग्य ठरेल, या शिवाय देशी गाईचे शेन व गोमुत्रा पासून तयार केलेली स्लरी किमान महिण्यातून एगदा देता येईल. तसेच विविध प्रकारची जिवाणू खते वेळोवेळी दिल्यास  फारशी रासायनिक स्वरूपातील खते मोठ्या प्रमाणात देण्याची गरज भासणार नाही, द्राक्ष वेलीस सर्वाधिक जास्त प्रमाणात  लागणारे अन्नद्रव्य म्हणजे नत्र होय. एप्रिल छाटणी किंवा  ऑक्टोबर छाटणी पुर्वी माती परिक्षण केल्यास जमिनीत असणारे ऊपलब्ध नत्राचे प्रमाण समजू शकते, जमिनीत सेंद्रिय कार्बने किती % प्रमाण आहे यावर नत्र किती हे सहज समजते, समजा आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.80 % च्या आसपास असल्यास त्या जमिनीत ऊपलब्ध नत्राचे प्रमाण हेक्टरी  500 किलोच्या जवळपास असतेच असते, यातील 20 % नत्र काही कारणांमुळे अनुपलब्ध झाले तरिही 400 किलो नत्र शिल्लक व ऊपलब्ध होऊ शकते, या शिवाय द्राक्ष बागेस  नियमित दिले जाणारे पाणी प्रयोगशाळेत परिक्षण केल्यास पाण्यातील नायट्रेट चे प्रमाण प्रती लिटर मधे 80 ते 185 पीपीएम एवढे आढळून येत आहे आणि पाण्यात विरघळलेले नायट्रेट सर्वाधिक पिकांकडून शोषले जाते, द्राक्ष बागेचा विचार केल्यास अशा पाण्याच्या माध्यमातून अंदाजे एकूण वर्षभरात हेक्टरी 125 किलो च्या आसपास नत्र ऊपलब्ध होऊ शकते, तसेच पावसाळ्या पुर्वी व पावसाळी वातावरणातून जमिनीत व द्राक्ष वेली कडून शोषन होनारे नत्र ही हेक्टरी 100 ते 150 किलो ऊपलब्ध होत असते, आणि आपण जे सेंद्रिय घटक देणार आहोत यातून ही हेक्टरी 150 किलो नत्र द्रव्याचा  पुरवठा होतो. (हेक्टरी एकूण 25 टन सेंद्रिय खतांमधून 0.6 % दराने नत्र ऊपलब्ध होईल असे गृहित धरूयात), आता आपल्या द्राक्ष बागेस एकूण 775 ते 800 किलो नत्र या सर्व परिस्थितीत आरामात मिळू शकते.  आता आपण नत्र किती शिफारस आहे ते पाहूयात,  मागील भागात आपण पाहिले की द्राक्ष बागेस हेक्टरी 900 किलो नत्र लागते म्हणजे आता हिशोब केल्यास हेक्टरी 100 ते 125 किलो नत्र अजून कमी पडते आहे, हे कमी पडलेले नत्र दोन्ही छाटणी वेळेस विभागुन द्यायचे ठरले तरी एका वेळी हेक्टरी  110 किलो युरिया देऊनही बागेची संपूर्ण नत्राची मात्रा पुर्ण होऊ शकते. द्राक्ष वेलीस नत्र पुर्ण क्षमतेने मिळाल्यास द्राक्ष वेलिच्या वाढीबरोबरच उत्पादन ही चांगले मिळते परंतू हेच नत्र गरजेपेक्षा जास्त झाल्यास द्राक्ष बागेवर वेगवेगळे दुष्परिणाम ही होतात, गरजेपेक्षा अती प्रमाणात नत्र पुरवठा केल्यास वेलीची अतिरिक्त वाढ होणे, अलावश्यक फुट होणे, पानांची  संख्या गरजेपेक्षा जास्त होते, पानांची जाडी कमी होते, पाने व काडीचा ठिसूळ पणा वाढतो त्यामुळे डाऊणी व भुरी सारखे  बुरशी लगेच वेलीत प्रवेश करते, रस शोषून घेनार्या किडी  प्रमाणापेक्षा जास्त वाढतात, घड पक्वतेचा कालावधी वाढतो या शिवाय अतिरिक्त नत्रामुळे इतर काही अन्नद्रव्ये वेलीस वेळीच ऊपलब्ध होत नाहीत. केवळ नत्र द्रव्याच्या असंतुलना मुळे च आज अनेक द्राक्ष बागाईतदार अनेक समश्यांना तोंड देत आहेत. म्हणुनच नियमित माती परिक्षण करूणच खतांचे संतुलन साधणे गरजेचे झाले आहे. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्  

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १६ 

नमस्कार शेतकरी मित्राने, आपल्या द्राक्ष बागेतुन ऊत्तम व निर्यातक्षम द्राक्ष निर्मिती करणे हे प्रत्येक द्राक्ष बागाईतदाराचे स्वप्न असते,आणि तसा प्रयत्न ही प्रत्येक जन करत असतो, परंतू आजकाल अनेक बागाईतदार प्रत्येक वेळी संघर्षच करताना दिसतात, यास अनेक कारणेही  आहेत, तरिही  कोनत्याही परिस्थितीत ईच्छित उत्पादन व दर्जा कायम ठेऊन नियोजन करावे लागेल, या नियोजना साठी द्राक्ष वेलीचीच मदत घ्यावी लागेल, द्राक्ष वेलीत असणारे मजबुत स्टोअरेज (अन्न साठा) हिच वेलीची ताकत असते, द्राक्ष वेलीत असनारी ताकत व प्रतिकारक्षमता अचूक  मोजण्याची साधने अजून ऊपलब्ध (विकसित) झालेली नाहित तरिही थोड्याश्या अनुभवाने हे ओळखने जमु शकते . वेलीत भरपूर प्रतिकार  क्षमता ही त्या वेलीस ऊपलब्ध  झालेल्या अन्नद्रव्यावर अवलंबून असते, तथापी कर्ब नत्राचे गुणोत्तर साधल्यास (10 : 1) द्राक्ष  बागेत चांगली प्रतिकार क्षमता तयार होते व उत्पादन ही चांगले सहज मिळवता येते. द्राक्ष बागेस  नेमकी किती खते द्यावयाची सरळ मुद्यांवरच येऊयात, विश्रांती काळापासूनच सुरवात करूयात, साधारणपणे द्राक्ष बागेतील सर्वच घडांची काढणी (हार्वेस्टिंग)पुर्ण झाल्यावर दोन तिन दिवसातच  एकरी 100 किलो डिएपी मधल्या मोकळ्या जागेत एकसारखे फोकून टाकून लगेचच भरपूर मोकळे पाणी सोडावे म्हणजे मग पहिल्या उत्पादना मुळे आलेला द्राक्ष वेलीचा  तनाव दुर होईल.मोकळे देन्या ईतके पाणी नसल्यास मधोमध एक ऊथळ खोलीचे तास पाडून त्यात डिएपी टाकून वरती एक ठिबकची लाईन बसवून घ्यावी व किमान सहा तास पाणी ड्रिपमधून सोडावे, मात्र बोधावर डिएपी देऊ नये कारण उत्पादन तयार करण्याच्या काळात मुळांना सतत काम करून एक प्रकारची मरगळ आलेली असते, व मधल्या पट्ट्यात डिएपी व पाणि मिळाल्यावर अन्नद्रव्याच्या अमिशाने मुळे पुढे सरसावतात व परत ताजी तवाणी होऊन कामास लागतात, या काळात द्राक्ष वेलीची पहिल्या उत्पादना मुळे  झालेली झीज भरून काढली जाते.  (डिएपी व पाण्याच्या ओलाव्यामुळे मुळांच्या शेंड्यावर निगेटिव्ह चार्ज वाढतो व याच काळात वेलीच्या खोड व पानातील जमा झालेली विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात) नंतर आपली जमिन जर काळी व भारी असल्यास विस दिवस व जमिनी मध्यम ते हलकी असल्यास दहा बारा दिवसासाठी विश्रांती साठी सोडून द्यावी. या काळात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हलके पाणी देण्यास हरकत नाही, जमल्यास मोकळे पाणी देण्यापूर्वीच मोकळ्या पट्ट्यात थोडेसे बाजरी,गहू  व ज्वारीचे बियाणे एकत्र करून  विस्कटून टाकावे म्हणजे ते आठ दहा दिवसात दोन तिन इंचा पर्यंत ऊगवुन येईल एप्रिल छाटणी करण्या पुर्वी च ते लहान ऊगवलेले धान्य कुळव किंवा ट्रॅक्टर ने मोडून टाकावे (हिरवळीचे मिनी खत) याच खतासोबत दोन खोडाच्या मधे लहान चर खोदून पाच सहा टन ऊत्तम कुजलेले मिक्स कंपोष्ट खत टाकले तरी चालेल. जमल्यास बेडवर ऊसाचे पाचटाचे आच्छादन करून घ्या  व योग्य  वेळ पाहून एप्रिल छाटणी करून घ्यावी, खरड छाटणी नंतर तापमान जर जास्त असेल तर दोन तीनदा बागेस  मोकळे पाणी सोडावे, वेलीच्या ओलांड्यावर हायड्रोजन सायनामाईड चे पेस्टिंग किंवा फवारणी करून घ्यावी म्हणजे सगळ्या बागेत एकसमाण व लवकर फुटी निघतील. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्  

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १७

द्राक्ष बागेस संतुलित मात्रेत खते वापरणे फायद्याचे ठरते, या साठी नियमित माती परिक्षण, पाणी परिक्षण व काडी देठ इत्यादी परिक्षण करूनच खंताचे नियोजन करणे गरजेचे आहे, अनेक शेतकरी शेंडा वाढ व भरपुर कॅनाॅपी साठी युरिया, अमोनियम नायट्रेट, युरिया फाॅस्फेट खतांचा अती प्रमाणात  वापर करत आहेत, त्यामुळे घडात साखर न भरण्याची नविनच समस्या तयार होत आहे, बहुतांश शेतकरी ऐन साखर (ब्रिक्स) भरायच्या वेळेस नत्र कमी करून पोटॅशियम ची मात्रा वाढविण्याचा प्रयत्न करतात, परंतू ऐन वेळी केलेल्या उपाययोजनेचा तितकासा उपयोग होत नाही, त्यासाठी नत्राचे नियंत्रण व पोटॅशियम चा वापर हा सुरवाती पासुनच नियोजन करावे लागेल. अलिकडील काळात द्राक्ष बागेत जमिनीत फाॅस्फरस ची कमतरता अनेक ठिकाणी जानवते आहे, ही तशी फारच गंभिर बाब बनत चालली आहे, 

मागील दोन वर्षात माझ्याकडे आलेल्या अनेक द्राक्ष बागेतील  माती नमुन्या मध्ये प्रयोगशाळेत परिक्षण केल्यानंतर फाॅस्फरस (स्फुरद) चे प्रमाण  हेक्टरी 10 किलोच्या खाली आलेले पहायला मिळाले आहे.  (एकूण नमुन्यापैकी 40 % नमुन्यात एवढे कमी फाॅस्फरस आढळले). वास्तविक पाहता द्राक्ष वेली साठी हे उपलब्ध फाॅस्फरस चे प्रमाण हेक्टरी 35 किलोच्या पुढे असायला हवे. अनेक मृदा तज्ञ मंडळी किंवा कृषी सल्लागार जमिनीत स्फुरद विरघळवणारे पिएसबी सारखे जिवाणू वापरण्याचा सल्ला देतात, कारण जमिनीत असनारे स्फुरद पीकाला सहसा सहज उपलब्ध होत नाही, अनेकदा रासायनिक खते मिस्त्र किंवा संयुक्त पद्धतीने दिली जातात व त्यातील स्फुरद इतर रासायनिक कनांसोबत संयोग होऊन क्लिष्ट संयुगावस्थेत जाते, अशा परिस्थितीत हे जिवाणू फायदेशीर ठरतात,  परंतू मातीतच स्फुरदाचे प्रमाण  अत्यल्प असल्यास हे जिवाणू फाॅस्फरस म्हणजेच स्फुरद तयार करू शकत नाहीत, स्फुरदाची पातळी वाढविण्या साठी राॅक फाॅस्फेट किंवा सिंगल सुपर फाॅस्फेट सारख्या खताचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरते, सिंगल सुपर फाॅस्फेट कंपोष्ट किंवा सेंद्रिय खतांसोबत एकत्र मिसळून जमिनीत टाकल्यास सेंद्रिय खतामधिल नत्र व इतर अन्नद्रव्ये उपलब्धता अनेक पटीने वाढते. ऑक्टोबर छाटणी पुर्वी सेंद्रिय कंपोष्ट खतासोबत एकरी 250 ते 300 किलो सिंगल सुपर फाॅस्फेट एकत्र मिसळून मुळांच्या सानिध्यात दिल्यास सेंद्रिय घटकामधिल अन्नद्रव्ये द्राक्ष वेलीस मिळायला सहज सोपे होऊन जाते, जमिन अल्कली गुणधर्माची असल्यास (7.5 पिएच पेक्षा जास्त असल्यास) याच खतासोबत 40-50 किलो  बेंटोलाईट गंधक  वापरावे, (18 -20 %) म्हणजे पिएच थोड्याफार प्रमाणात  नियंत्रणात राहील.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १८

नमस्कार शेतकरी बंधूनो, बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदारांना ऐन फुगवनीच्या काळात कमी तापमानाचा सामना करावा लागते,  कमी तापमानामुळे मणी क्रॅकिंग ची समश्या येऊ शकते.   किमान  तापमानात म्हणजे 15 अंश डिग्री सेल्सियस च्या खाली तापमानात  द्राक्ष वेलीची मुळे काम करणे बंद करतात, पाने प्रकाशसंश्लेषन करण्याचे काम बंद किंवा कमी करतात, कमी तपमानामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईड जमिनीलगत च रहातो व (15 अंश डिग्री सेल्सियस पेक्षा कमी तपमानात कार्बन डाय ऑक्साईड चे वजन ईतर वायुंपेक्षा जास्त वाढते व तो रात्री चे वेळी पानांपर्य॔त पोहचतच नाही) प्रकाशसंश्लेषन क्रिया बंद होते  परिणामी द्राक्ष वेलींच्या पानांकडून नविन अन्न निर्मिती थांबते आपण पाठीमागील एका भागात  वाचलेही असेल पानांकडून संकेत मिळाल्यावरच मुळे जमिनीतील घटक शोषून घेतात व पानांकडे पोहचवत असतात अगदी त्याच वेळी पानांकडून ही एक प्रवाह मुळांकडे जात असतो, याच प्रक्रिये दरम्यान पानांकडून तयार झालेले अन्न (कर्बोदके) खोडात तात्पुरते साठवले जाते  व परत ते अन्न साठवण्यासाठी घडांकडे पाठवले जाते. परंतू नेमके कमी तपमानात (15 पेक्षा कमी) पानांकडून कर्ब ग्रहन करण्याचे काम मंदावते, याचा अर्थ असा होतो की घड व मणी फुगवन होणे, उर्जा निर्मिती कार्य मंदावते, परंतू घड व मणी मात्र खोड वलांडा व काडीत साठवलेले पाणीच स्वतःकडे ओढुन घेत असतात परंतु याच काळात घडांचा विकास व मणी फुगवन होण्यासाठी फक्त पाणी च नाही तर अनेक प्रकारची अन्नद्रव्ये ( खनिजे ) लागतात व या अन्नद्रव्यांना व्यवस्थापित करण्यासाठी विविध प्रकारची संप्रेरके मदत करत असतात. ही साखळी मात्र कमी तपमानात विस्कळीत होते व मण्यावरील साल अर्थात त्वचा वाढने बंद होते व आतील गरात फक्त पाणी साठा वाढत जातो परिणामी असे मणी फाटतात व यालाच क्रॅकिंग म्हणतात. काही द्राक्ष बागांमधे खोड व ओलाड्यांमधे गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्ये साठविलेली असतात यालाच स्टोअरेज किंवा राखीव अन्नसाठा असे म्हणतात. असे स्टोअरेज असलेल्या द्राक्ष वेलीवर लगेच कमी तापमानाचा परिणाम होत नाही. या परिस्थितीत द्राक्ष बागांचे थंडी पासून  संरक्षण  करावे लागते, अगदिच तपमान  फारच कमी म्हणजे सात आठ सेल्सियस इतके खाली आल्यास बागेत रात्री शेकोट्या पेटवुन घूर करावा म्हणजे बागेत थोडे ऊबदार वातावरन तयार होइल, मुळावाटे अन्नपुरवठा होत नसल्यास  कृत्रिम रित्या  पानांवर फवारणी मधून लागणारी अन्नद्रव्ये द्यावीत, बाग 50-60 दिवसांची झाली असल्यास फवारणी मधून 12:61:00 दोन ग्राम + एसव्हि किटोन सव्वा मीली ने घ्यावे,  मणी पाणी ऊतरण्याच्या टप्प्यावर असताना एक वेळ मॅग्नेशियम सल्फेट 3 ग्राम + एसव्हि  किटोन सव्वा  मिली ने फवारणी करावी, व एक वेळ चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट 1 ग्राम + एसव्हि किटोन सव्वा मिली ने फवारणी करावी , शक्यतो बागेस पहाटे पाणी द्यावे, तापमान रोजच्या पेक्षा कमी होत असल्यास द्राक्ष बागेस एकरी एक लिटर एसव्हि किटोन + एक लिटर एसव्हि काॅफेझ  ड्रिपमधून सोडावे म्हणजे घड ताबडतोब नरम व लवचिक होतील व सहसा क्रॅकिंग होनार नाही. तथापी द्राक्ष वेल ऑक्टोबर छाटणी पुर्वी च भरपूर स्टोअरेज ने संपृप्त असावी या साठी ही तयारी एप्रिल छाटणी पासूनच नियोजन काटेकोरपणे करावे लागेल. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्  

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १९

नमस्कार शेतकरी बंधूनो,  आपण कालच्या भागात अती थंड तपमाना मुळे द्राक्ष मणी तडकण्याची कारणे व उपाययोजना या विषयी जाणून घेतले आहे, क्रॅकिंग बरोबरच इतरही अनेक प्रकारची विकृती द्राक्ष घडा मधे येत असते या विषयी आपण जाणून घेणार आहोत. द्राक्ष मण्यांमधे प्रामुख्याने शाॅर्ट बेरिज, वाॅटर बेरिज, पिंक बेरीज, मणी देठ जळ (स्टाॅक निक्रोसिस) व मणी हिरवे रहाणे इत्यादी विकृती आढळतात. द्राक्षमण्याच्या देठाची जळ या विकृतीमध्ये द्राक्षमण्यात साखर भरण्याचे वेळेपासून देठावर टाचणीचे टोकाएवढे प्रथम पांढरट तपकिरी ठिपके पडून नंतर ते काळपट तपकिरी होतात आणि पक्ववेत वाढ होत असताना या ठिपक्यांच्या आकारातही वाढ होऊन असे अनेक ठिपके एकत्र आल्याने घडांचे अथवा मण्यांचे देठ जळून जातात. पक्वता जशी वाढत जाईल तसतशी ही विकृती वाढत जाते. यामुळे वेलीमधून साखर, पाणी आणि इतर घटकांचे वाहन यावर परिणाम होतो आणि याचा परिणाम मऊ, हिरवट , बिलबिलीत , पाणीदार आणि परिणामी सुकलेले द्राक्षमणी घडामध्ये तयार होतात. शेवटी याचा परिणाम घडांचे ताजे वजन, रसाचे उत्पादन, विद्राव्य साखर आणि अॅन्थोसायनीनसारखे रंगीत घटक यावर अनिष्ट परिणाम होतो, तर द्राक्षमण्यांचे आम्लतेत वाढ होते. द्राक्षाचे उत्पादनावर आणि प्रतीवर आश प्रकारे अनिष्ट परिणाम झाल्यामुळे दर्जेदार उत्पादन घटते. परिणामी निर्यातक्षम द्राक्षे तयार करण्यात अडचणी येतात. ही विकृती संजीवके आणि अन्नद्रव्ये यांचा असमतोल विशेषत : पोटॅश कॅल्शियम + मॅग्नेशियम यांचे गुणोत्तर यांचेशी संबंध असतो

अमोनिकल नत्राचा आणि पोटॅशचा पुरवठा करणे टाळावे. हे दोन्ही घटक कॅल्शियमच्या शोषणावर वाईट परिणाम करतात. मणी 8 एम. एम. आकाराचे असतानांच कॅल्शियम क्लोराईड 500 ग्रॅम / 200 लिटर पाण्यातून फवारावे. त्यानंतर यानंतर 10 दिवसाच्या अंतराने २ फवारे द्यावेत. 10 एम. एम. बेरी साईज असतांना नंतर 2 वेळा 10 दिवसांच्या अंतराने मॅग्नेशियम सल्फेटचे फवारे द्यावेत. प्रमाण 5  ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रती लि.पाण्यातून द्यावे. मॅग्नेशियम  सल्फेट सोबत एसव्हि किटोन एकत्र मिसळून फवारणी केल्यास चांगला फायदा होतो,  याच काळात पानांवर चांगला धन भार सक्रिय ठेवण्यासाठी एसव्हि किटोन अत्यंत प्रभावी पणे काम करते. पानांवर जेव्हा धन भार सक्रिय असतो तेव्हा मुळांवर निगेटिव्ह चार्ज सक्रिय झालेला असतो. व मुळांचे काम पुर्ववत चालु होते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स् 

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २०

द्राक्षाचा घड वाढत असताना काही मणी मोठे न होता लहान आकाराचे राहतात. यालाच शार्ट बेरीज म्हणतात. शार्ट बेरीज होण्याची संभाव्य कारणे  परागीभवन चांगले न होणे, फुलांचे भाग विकृती असल्यास असे होते.  कर्बोदके (CHO) कमी पडल्यास फुले मण्यामध्ये विकसित होण्यास अडचण येते. जीए लवकरच्या स्टेजमध्ये वापरले तर शॉर्ट बेरीजचे प्रमाण वाढते. फळधारणेच्या काळात थंडी किंवा धुके असणे. बोरॉन व झिंक ह्या पोषक द्रव्यांची कमतरता. वेलीला व्हायरसची लागण झाल्यावरही असे होते. ही विकृती टाळण्यासाठी प्रमाणात जी. ए. सारखी संजीवके वापरावीत. सुक्ष्मद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावीत. घडांची संख्या पानांच्या प्रमाणात ठेवावी, म्हणजे कर्बोदके कमी पडणार नाहीत. घडांची विरळनी योग्य वेळी करावी. म्हणजे शाॅर्ट बेरिज होनार नाहित. द्राक्षे पिकायला लागल्यानंतर द्राक्ष घडातील  काही मणी रंगाला मंद दिसतात, नरम पोताचे असतात, त्यात गर नसतो, गोडी नसते, फक्त आंबट पाणी असते. हे मणी संपूर्ण घडात इकडे तिकडे पसरतात. माल झाडावर जास्त दिवस ठेवल्यास हे मणी सुकतात व कधी कधी गळूनही जातात. एकूण वजनात त्यामुळे घट होते. झाडावरून द्राक्षे तोडल्यावर हे मणी लवकर सुकतात. त्यामुळे बाजारात पेटीतील माल खराब दिसतो. ह्या मण्यांना 'वॉटर बेरीज' म्हणतात. हे बनण्याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे पालाशची कामतरता, मणी पोसत असताना पाण्याचा ताण, जास्त नत्र, द्राक्ष घडांना कॅल्शियम पुरवठा कमी पडणे. द्राक्ष वेलीवर प्रमाणापेक्ष जास्त द्राक्ष घड ठेवल्यास अन्नद्रव्ये कमी पडतात,  द्राक्ष घड घट्ट झाल्यास मण्यांच्या पेशी (झायलम) दबून जातात व पुढे अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळेही वॉटरबेरीज वाढतात , वर नमुद केलेल्या कारणांचा निट विचार केल्यास आपल्याला वॉटरबेरीज निश्चित कमी करता येतील. मात्र सर्व उपाय फलधारणा होत असतानाच कराव्यात. फळछाटणी पुर्वीच माती व काडीची अन्नद्रव्य परिक्षण केल्यास त्यानुसारच अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येईल.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स् 

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २१

द्राक्ष मण्यातील विकृती
पिंक बेरीज-
साधारणत : द्राक्षात पाणी उतरायला लागल्यावर गुलाबी मणी दिसायला सुरुवात होते. असे मणी काहीसे आकाराने लहान असतात. द्राक्षे जशजशी पिकत जातात. तसतसा हा रंग अधिक गर्द होत जातो. ही द्राक्षे आधी आकर्षक दिसत असली तरी, बाजारात पोहचेपर्यंत गर्द लाल व काळसर रंगाची होतात, त्यांची चमक जाते. 
पिंक बेरीज होण्याची कारणे: 
अॅन्थोसायनिन नावाच्या द्रव्यामुळे पिंक बेरीज होतात. हे बऱ्याच फळांत, फुलांत आणि पानांत सुद्धा आढळून येत असते. पेशीचे जे व्हेस्क्युलर सॅप असतात त्यात हे आढळते. जास्त पीवळे  असलेल्यामध्ये हा द्रव घातल्यास त्याचा रंग गर्द होतो. म्हणून काही फुलांचा रंग गर्द करण्यासाठी अमोनियम हायड्रोंक्साईडची वाफ देतात.
अॅन्थोसायनिनची रासायनिक प्रक्रिया होणाऱ्या कागदावरील आलेख केल्यावर असे आढळून आले की याचे चार प्रकार आहेत.
१) सायनाडीन,२)माल्व्हीडीन, ३)पिनोनिडीन, ४)मनोग्लुकोईज,ह्यातला पिनोनिडीन जास्त प्रमाणात असतो. बाकीचे अगदी अल्प प्रमाणात असतात. मुख्यत : नैसर्गिक चार घटकांची क्रिया अॅन्थोसायनिन तयार होण्यावर होते. तापमानातील चढउतार, तीव्र सुर्यप्रकाश, नत्राची कमतरता, फॉस्फरसची कमतरता. झाडाच्या पेशीमध्ये साखर जेव्हा जलद गतीने जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ते अॅन्थोसायनिन तयार व्हायला उत्तेजन देतात. नत्राच्या पुरवठ्याने साखर नत्रजन्य पदार्थात रूपांतरित होते आणि साखरेची तीव्रता कमी होते. त्याचबरोबर अॅन्थोसायनिन कमी होते. मण्यात पाणी उतरतांना इथ्रेल वापरल्याने अॅन्थोसायनिन वाढतात. 
उपाय योजणा:
१) २५० ग्रॅम अॅस्कोर्बिक अॅसिड २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. दुसऱ्या दिवशी ५०० ग्रॅम सोडियम डायथील डिथोकार्बोमेट प्रती २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. अशा २- ३ फवारण्या ८ दिवसांच्या अंतराने कराव्यात, मात्र ह्या रसायनांचा एकरी खर्च जास्त असतो.
२) ५ ग्रॅम युरीया व २ ग्रॅम बोरीक अॅसिड प्रती १ लिटर पाण्यातून फवारल्यास शेंदरी मणी कमी होण्यास मदत होते.
३) एकरी १३ किलो बोरॅक्स एप्रिल छाटणीनंतर जमिनीतून दिल्यास ही विकृती लक्षणिकरित्या कमी होऊ शकते.

मणी हिरवे राहणे : (दाढेमणी)
या विकृतीमध्ये द्राक्ष पिकायला सुरुवात झाल्यानंतर घडाच्या शेंड्याकडील तसेच फांद्याकडील काही मणी पिकत नाही व ते मणी सुरकतले जाऊन गळून पडतात. जसा घड पिकत जाईल तसा या विकृतीचा प्रादुर्भाव वाढत जातो. अशा विकृती ने ग्रासलेले मणी गोडीला फार कमी असतात. तसेच त्यामध्ये गर नसतो. ही विकृती थॉम्पसन सिडलेस या जातीत मोठ्या प्रमाणात दिसून येते.  कारणे : १) मण्यांच्या वाढीच्या काळात वेलींना पाण्याचा ताण पडला असल्यास. २) बोरॉन सारख्या मुलद्रव्यांनी कमतरता पडल्यास. ३) रासायनिक खतांचा वाजवीपेक्षा जास्त वापर केल्यास. ४) ज्या बागेत पाण्याचा योग्य निचरा होत नाही व चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, तेथे ही विकृती मोठ्या प्रमाणात दिसून येते.
५) घडांना कॅल्शियमचा पुरवठा कमी झाल्यास.
६) वेलींवर प्रमाणापेक्षा जास्त घड ठेवल्याने सर्व घड योग्य पोसले न गेल्याने
७) घडाच्या पुढे पाने कमी ठेवली असल्यास.

उपाय  १) खरड छाटणीनंतर प्रत्येक वेलीवर काड्यांची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे.
२) ऑक्टोबर छाटणीनंतर वेलीवर घडांची संख्या मर्यादित ठेवावी.
३) घडाचा शेंडा खुडणे व विरळणी वेळेवर करावी.
४) जी. ए. चा वापर काळजीपूर्वक करावा व वाढीव प्रमाणात जी. ए. वापराचा मोह टाळावा.
५) बागेत पाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे.
६) पालाश, बोरॉन, कॅल्शियम व मॅग्नेशियमसारख्या मुलद्रव्यांचा योग्य पुरवठा करावा.
७) घडांच्यापुढे पाने कमी राखल्यास घडांस अन्नाचा तुटवडा पडतो व घडांचे योग्य पोषण होत नाही.
८) पानातुन तसेच जमिनीतून सुक्ष्म मुलद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा. योग्य  व्यवस्थापन केल्यास आपण द्राक्ष मण्यातील विकृती टाळू शकतो. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्  

shope
द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २२

नमस्कार शेतकरी बंधूनो,  
बऱ्याच वेळा द्राक्ष बागांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागतो, अगदी बर्फ तयार होण्याइतपत तापमान खाली येते, या प्रचंड थंडी मुळे माझ्या द्राक्ष बागेचे काही नुकसान तर होनार नाही ना या चिंतेने शेतकरी बंधू धास्तावतात, आणी बागेचे संरक्षण करण्याच्या नादात चुकिची उपाययोजना केल्यास प्रसंगी नुकसान होऊ शकते, हे नुकसान होऊ नये म्हणून अती थंडी तापमानात द्राक्ष बागेवर काय परिणाम होतात हे आपण आज पाहणार आहोत.  सर्वसाधारणपणे पाण्याचे किंवा दवबिंदूचे बर्फात रूपांतर होण्यासाठी हवेतील सापेक्ष तापमान से 4 अंश डिग्री सेल्सियस च्या खाली आले तरच बर्फ तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. साधारणपणे तपमान 4 अंशाच्या खाली रात्रभर नसते, पहाटे पाच वाजल्या नंतर तापमान वेगाने खाली येते, आपल्याकडे अगदी पहाटे  साडेपाच  ते सात या वेळेतच पाणी व दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया होते व व नंतर सुर्योदयानंतर हळूहळू तपमान वाडायला सुरवात होते, द्राक्ष वेलीवर इतक्या कमी तपमानाचा निच्छितच परिणाम होतो, मुळांचे काम मंदावते, व घडातील मणी सुद्धा फुगवन थांबते, काही पानांवर व मण्यांवर  दव गोठून बर्फ दिड तासा पेक्षा जास्त काळ साठून राहिल्यास अश्या भागावर करपल्याचे डाग पडतात, द्राक्ष वेलीची चयापचय क्रिया मंदावते परंतु थांबत नाही, प्रकाशसंश्लेषन क्रिया मात्र चालूच रहाते, याच कारण म्हणजे आपल्याकडे पाणी गोठण्याची क्रिया संपूर्ण दिवसभर नसते, पहाटे पासून सकाळी आठ पर्य॔तच ही अवस्था टिकते व दिवस भर जरी तापमान कमी असले तरी गोठन बिंदू इतके नसते सुर्यप्रकाशाचा कालावधी मात्र कमी झालेला असला तरी पाणी , कार्बन डाय ऑक्साईड  व सुर्यप्रकाश मिळून कर्बोदके ( शर्करा CHO ) निर्मिती ही धिम्या गतीने चालूच रहाते, याचा एक परिणाम असा होतो की द्राक्ष मण्यांमधे पेशी विभाजन थांबते, क्वचित प्रसंगी विकृती ही येऊ शकते, मणी फुगवन संथ गतीने होते, साखर निर्मिती मंदावते, आंथ्रोसायनिन चे प्रमाण वाढून आम्लता वाढते व मणी आंबट बनायला सुरवात होते, याच काळात विनाकारण रासायनिक खतांचा भडिमार केल्यास मणी तडकण्याची क्रिया चालू होते, कारण मुळांचे कार्य मंदावलेले असते, त्या मुळे अन्नद्रव्ये पुरवठा होत नाही, याचा अर्थ असा असतो की मणी फुगवन वेग मंदावतो व द्राक्ष तयार होण्यासाठी लागणारा कालावधी हा लांबतो, बस इतकेच  हे सर्व टाळायचे असल्यास उपाययोजना करता येईल,  ती पुढील प्रमाणे,दवबिंदू गोठतात ते पहाटे साडेपाच  ते सात या वेळेतच याच वेळेत बागेत धुर तयार करावा व ठिबक संच ही चालू करून पाणी देत रहावे,  सकाळी विहरिचे किंवा शेततळ्याचे पाणी गरम असते व धुरा मुळे बागेतील तापमान गोठनबिंदूच्या खाली येत नाही अगदी बागेत वेगवेगळ्या अंतरावर चार पाच ठिकाणी शेकोटी करून धूर केल्यास त्या बागेत दवबिंदू गोठणार नाही, व बर्फामुळे पानांना होणार्या इजा व डाग पडणार नाहीत, हा प्रकार रोज पाच सहा दिवस कंटिन्यु करावा लागेल, कारण दव गोठण्याइतपत कमी तपमान जास्त दिवस टिकत नाही, एसव्हि किटोन चा फवारणी व ड्रिपमधून वापर केल्यास प्रकाशसंश्लेषन क्रिया चालुच राहील, अधून मधून अल्प प्रमाणात एनपिके फवारणी मधूनही देता येइल, याच काळात एसव्हि फ्रुटर चा ड्रिप खाली वापर केल्यास मुळे एवढ्या कमी तपमानात सुद्धा कार्यक्षम राहतील, खरे तर याच काळात मुळांवर निगेटिव्ह चार्ज असायला हवा आहे, तो चार्ज एसव्हि फ्रुटर बेमालूमपणे तयार करते, अगदी त्याच वेळी फवारणी मधून पानांवर पाॅजिटिव्ह चार्ज  तयार करायचे काम एसव्हि किटोन + चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट किंवा 13:00:45 किंवा 19:19:19 अल्प प्रमाणात तयार करेल. पाने, मुळे, व मण्यांची फुगवन व शर्करा निर्मिती चालू राहील,  व अती थंडीत सुध्दा आपली बाग सुरक्षित राहू शकेन. सविस्तर उपाययोजना पुढिल प्रमाणे करता येईल, एकरी 100 किलो एसव्हि फ्रुटर ड्रिपरखाली टाकून रोज पहाटे साडेपाच ते सात या वेळात कमी दाबाने पाणी देने, दुसर्या दिवशी एकरी पाच लिटर एसव्हि साईज बिल्डर सोडने, फवारणी साठी 200 लिटर पाण्यात 250 मिली एसव्हि किटोन + 100 ग्राम चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट + 300 ग्राम 13:00:45 एकत्र मिसळून फवारणी करावी, तीन दिवसांनी एकरी एक एक लिटर एसव्हि किटोन ड्रिपमधून सोडावे, म्हणजे मण्यांमधे कुठलिही विकृती न येता अती थंडीतही फुगवन चालूच राहील.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स् 

shope
डाळिंबावरील तेल्या रोग:

Oily spot of Pomegranate-

Causal agent- Xanthomonas axonopodis pv. punicae

डाळिंबावरील तेल्या रोगाची झाडांना लागण होण्याची कारणे :

१. तापमान २८ ते ३२ अंश सेल्शिअस असताना

२. हवेतील आद्रता ७० % पेक्षा जास्त असणे

३. तेल्याग्रस्त मातृवृक्षापासून तयार रोपांपासून लागवड केल्यास 

४. नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर

  • नत्राचा वापर करताना पावसाळी वातावरणात हवेतून/ पावसाच्या पाण्यातून पिकांना मिळणारे नत्र गृहीत धरावे.
  • जमिनीमध्ये असणाऱ्या जिवाणूद्वारे स्थिर होणारे नत्राचे प्रमाण गृहीत धरावे
  • नदी किंवा कॅनाल चे पाणी वापरात असाल तर अश्या पाण्यातून पिकाला मिळणारे नायट्रेट चे प्रमाण गृहीत धरावे

५. जमिनीतील क्लोराईड चे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असणे.

  • पाण्याद्वारे जमिनीत वाढणाऱ्या क्लोराईड चे प्रमाण/ खताद्वारे दिले जाणारे क्लोराईड चे प्रमाण व जमिनीत वाढलेले क्लोराईड चे प्रमाण तपासावे

६. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ पेक्षा कमी असणे

  • रासायनिक खतांचा जास्त वापर
  • सेंद्रिय खतांचा कमी वापर
  • जमिनीमध्ये कमी होत चाललेली जिवाणूंची संख्या 

७. झाडांना होणाऱ्या जखमा 

  • छाटणी केल्यानंतर झाडांना होणारी जखम
  • शेंडे किंवा वॉटरशूट काढल्यानंतर झाडांना होणारी जखम
  • शेतीची अवजारे जसे कि ब्लोवर, ट्रॉली इतर अवजारे यामुळे झाडांना होणारीजखम
  • गारपीट झाल्यानंतर गारांमुळे झाडांना होणारी जखम,
  • जास्त नत्रामुळे लुसलुशीत झालेली पाने व फळे (हि पण एक जखमच म्हणावी लागेल)

८. निमॅटोड (सूत्रकृमी) च्या प्रादुर्भावाने किंवा अपुऱ्या पोषणाने झाडे कमकुवत असणे.

९. शेतात वापरण्यात येणारी रोगग्रस्त अवजारे, जसे की छाटणीसाठी वापरण्यात येणारी कात्री.

 

एस व्हि ऍग्रो सोल्युशन्स तेल्या नियंत्रण उपक्रम:

  • वरील बाबींचा विचार करून बाहार धरताना काय करावे व काय करू नये याचे वेळापत्रक तयार करावे
  • छाटणी करण्याच्या कात्री निर्जंतुक करून घ्यावे
  • नवीन लागवड करताना ज्या बागेमध्ये रोपे तयार केली आहे त्याचा इतिहास तपासावा, तेल्याग्रस्त बागेत तयार केलेली रोपे लागवडीसाठी वापरू नयेत.
  • वर दिल्याप्रमाणे छाटणी झाल्यानंतर, शेंडे काढल्यानंतर किंवा इतर कारणाने झाडांना जखम झाल्यास त्वरित एस व्हि राउंडर पी २.५ ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करावी.
  • पहिले पाणी देताना राऊंडर पी जमिनीतून देणे: निमॅटोडच्या (सूत्रकृमी) नियंत्रणासाठी, जमिनीतील तेल्याच्या जिवाणूंच्या नियंत्रणासाठी तसेच झाडांची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी.)
  • फळांचा रंग बदलण्याच्या अवस्थेमध्ये जसे कि फळ हिरवे होताना एकदा व फळ शेंदरी रंगाचे होताना  एकदा एस व्ही राउंडर पी १ किलो आणि एस व्ही एक्झिटम १ किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून सोडावे.
  • तेल्याग्रस्त बागेमध्ये आद्रता वाढल्यानंतर, तेल्या रोगाच्या जीवाणूंसाठी पोषक वातावरण असताना एस व्हि राउंडर पी + राऊंडर एल, एस व्हि डिफेन्स च्या आलटून पालटून फवारण्या घ्यावी.
  • झाडांना दिले जाणारे नत्राच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे (वर दर्शविल्याप्रमाणे सर्व बाबींचा विचार करावा)
  • हिरवळीची खते, उसाच्या पाचटाचे आच्छादन करावे.
  • जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपाय योजना कराव्यात, सेंद्रिय घटकांचा, शेणखताचा वापर वाढवावा तसेच  बेसल डोस मध्ये एस व्हि फ्रुटर एकरी १०० ते १५० किलो चा वापर व एस व्हि ५९ + एस व्हि के ड्रीप च्या वापराने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
  • जमिनीतील वाढलेले क्षारांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी एस व्हि टर्मिनस १ लिटर एकरी २ महिन्यांतून एकदा जमिनीतून द्यावे.
  • चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांचे मुळांद्वारे शोषण कमी होते, तरी अश्या जमिनीत गंधक, स्फुरद, मंगल यांची वाढीव मात्रा द्यावी.
  • तेल्याग्रस्त बागेत सुरुवातीपासून एस व्हि ऍग्रो च्या वेळापत्रकाचा अवलंब केल्यास तेल्या रोगाचे प्रमाण कमी करता येते. 

shope
क्षारयुक्त जमीनीचे पाणी व्यवस्थापन

काळ्या खोल जमिनीमध्ये द्राक्ष पाणी व्यवस्थापन
क्षारयुक्त जमीनीचे व्यवस्थापन-
 द्राक्ष बागेस पाणी किती द्यावे हे फार महत्वाचे असते, सर्वसाधारण जमिनीचा प्रकार पाहून पाणी द्यावे लागते. जमिन काळी भारी प्रकारची असल्यास पाणी हलक्या मध्यम जमिनीपेक्षा कमी द्यावे लागते,  परंतू अशी काळी व भारी जमिनीचे ही दोन प्रकार पडतात, (पुर्वी नव्हते) एक जमिन पाण्याचा चांगला निचरा करू शकते व दुसरी काळी व भारी खोलीची असुनही पाण्याला अजिबात खाली निचरा करू देत नाही. याच कारणही तसेच आहे, बागेस नियमित वापराचे पाणी क्षारयुक किंवा अती क्षारयुक असल्यास हे क्षार अशा जमिनीत एका ठराविक खोलीवर जाऊन अडकून पडतात व नंतर परत परत पाण्यातुन आलेले नविन क्षार पहिल्या क्षार कंणाना चिकटतात, पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्यास हे क्षार  धुवून सुद्धा जातात,  परंतू या वर्षी तेवडा मोठा पाऊस झालेला नाही त्यामुळे अशा अनेक काळ्या जमिनीमधे ही समस्या पहायला मिळते आहे,  काळ्या जमिनीमधे सोडीयम चे क्षार जास्त प्रमाणात साठून जमिनीची निचरा क्षमता कमी होते तर चुनखडीयुक जमिनीत  कॅल्शियम कार्बोनेट च्या जास्त क्षारामुळे पाण्याचा निचरा कमी होतो. काळ्या जमिनीमधे   सोडीयम चे क्षार जास्त प्रमाणात असल्यास अशा जमिनीत भरपूर जिप्सम चा वापर करण्याची शिफारस केली जाते परंतु हा जमिनीचा निचरा वाढविण्याचा तात्काळ ईलाज नाही. हा प्रयोग बाग विश्रांती काळात असताना फायदेशीर ठरतो, जास्त चुनखडी असलेल्या जमिनीत एकरी 50 किलो गंधक दिल्यास अश्या जमिनी चा निचरा वाढतो. या शिवाय काळ्या जमिनीमधे द्राक्ष बागेस  पाणी बागेच्या अवस्थे नुसार द्यावे लागते, अशा जमिनीला विश्रांती काळात एकरी 5000 लिटर आठवड्यातून दोनदा, एप्रिल छाटणी नंतर एकरी 17500 ते 18000 लिटर दररोज व ऑक्टोबर छाटणी नंतर पहिल्या फुटीच्या वेळेस दररोज  एकरी 4000 ते 6000लिटर व घड वाढीच्या अवस्थेत एकरी 10500 ते 18000 लिटर  पाणी द्यावे लागते, (हे पाणी देताना अनावश्यक फुटी किती फुटतात हे पाहूनच पाण्याचे नियोजन करावे लागते) अनेकदा काळ्या जमिनीमधे पाण्याचा निचरा होत नसल्यास अशा जमिनीत विविध जिवाणू व सेंद्रिय घटक फारच कमी आहेत असे समजावे, जमिनी भरपूर सेंद्रिय घटक व जिवाणूयुक्त असल्यास जमिनीचा निचरा ऊत्तम राहतो व अशी जमिन पोकळ व भुसभूशीत असते. अशा जमिनीत थोडे फार जास्त पाणी झाले तरीही ऊत्तम निचर्या मुळे बाग पिवळी पडत नाही, परंतू काळ्या जमिनीमधे निचरा होतच नसेल तर तात्काळ उपाययोजना करावी लागेल, एकरी 150 किलो एसव्हि फ्रुटर ड्रिपर खाली एक इंच मातीआड करावे व एकरी दोन लिटर एसव्हि59 + दोन लिटर एसव्हिके ड्रिप एकत्र करून ठिबक मधून सोडावे, यातील प्रचंड मोठ्या संख्येने आलेले जिवाणू लगेच कामाला लागतात या जिवाणू ना एसव्हि फ्रुटर मधून भरपूर खाद्य ऊपलब्ध झाल्यामुळे ते जिवाणू वेगवान हालचाली करून जमिन पोकळ करतात ,  चार आठ दिवसात या जमिनीत गांढूळाची संख्या वाढायला लागते व फारच कमी वेळात जमिनीचा निचरा चमत्कार झाल्यासारखा वाढतो, जमिनीत अडकलेले अतिरिक्त क्षार विरघळले जातात व द्राक्ष वेलीस जमिनीत असणारी अन्नद्रव्ये सहज ऊचलुन घेता येतात व जमिनीच्या आरोग्या बरोबरच चांगल्या दर्जाच्या द्राक्ष घडांची निर्मिती करणेही सहज सोपे होऊन जाते.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्