blog

क्षारयुक्त जमीनीचे पाणी व्यवस्थापन

काळ्या खोल जमिनीमध्ये द्राक्ष पाणी व्यवस्थापन
क्षारयुक्त जमीनीचे व्यवस्थापन-
 द्राक्ष बागेस पाणी किती द्यावे हे फार महत्वाचे असते, सर्वसाधारण जमिनीचा प्रकार पाहून पाणी द्यावे लागते. जमिन काळी भारी प्रकारची असल्यास पाणी हलक्या मध्यम जमिनीपेक्षा कमी द्यावे लागते,  परंतू अशी काळी व भारी जमिनीचे ही दोन प्रकार पडतात, (पुर्वी नव्हते) एक जमिन पाण्याचा चांगला निचरा करू शकते व दुसरी काळी व भारी खोलीची असुनही पाण्याला अजिबात खाली निचरा करू देत नाही. याच कारणही तसेच आहे, बागेस नियमित वापराचे पाणी क्षारयुक किंवा अती क्षारयुक असल्यास हे क्षार अशा जमिनीत एका ठराविक खोलीवर जाऊन अडकून पडतात व नंतर परत परत पाण्यातुन आलेले नविन क्षार पहिल्या क्षार कंणाना चिकटतात, पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्यास हे क्षार  धुवून सुद्धा जातात,  परंतू या वर्षी तेवडा मोठा पाऊस झालेला नाही त्यामुळे अशा अनेक काळ्या जमिनीमधे ही समस्या पहायला मिळते आहे,  काळ्या जमिनीमधे सोडीयम चे क्षार जास्त प्रमाणात साठून जमिनीची निचरा क्षमता कमी होते तर चुनखडीयुक जमिनीत  कॅल्शियम कार्बोनेट च्या जास्त क्षारामुळे पाण्याचा निचरा कमी होतो. काळ्या जमिनीमधे   सोडीयम चे क्षार जास्त प्रमाणात असल्यास अशा जमिनीत भरपूर जिप्सम चा वापर करण्याची शिफारस केली जाते परंतु हा जमिनीचा निचरा वाढविण्याचा तात्काळ ईलाज नाही. हा प्रयोग बाग विश्रांती काळात असताना फायदेशीर ठरतो, जास्त चुनखडी असलेल्या जमिनीत एकरी 50 किलो गंधक दिल्यास अश्या जमिनी चा निचरा वाढतो. या शिवाय काळ्या जमिनीमधे द्राक्ष बागेस  पाणी बागेच्या अवस्थे नुसार द्यावे लागते, अशा जमिनीला विश्रांती काळात एकरी 5000 लिटर आठवड्यातून दोनदा, एप्रिल छाटणी नंतर एकरी 17500 ते 18000 लिटर दररोज व ऑक्टोबर छाटणी नंतर पहिल्या फुटीच्या वेळेस दररोज  एकरी 4000 ते 6000लिटर व घड वाढीच्या अवस्थेत एकरी 10500 ते 18000 लिटर  पाणी द्यावे लागते, (हे पाणी देताना अनावश्यक फुटी किती फुटतात हे पाहूनच पाण्याचे नियोजन करावे लागते) अनेकदा काळ्या जमिनीमधे पाण्याचा निचरा होत नसल्यास अशा जमिनीत विविध जिवाणू व सेंद्रिय घटक फारच कमी आहेत असे समजावे, जमिनी भरपूर सेंद्रिय घटक व जिवाणूयुक्त असल्यास जमिनीचा निचरा ऊत्तम राहतो व अशी जमिन पोकळ व भुसभूशीत असते. अशा जमिनीत थोडे फार जास्त पाणी झाले तरीही ऊत्तम निचर्या मुळे बाग पिवळी पडत नाही, परंतू काळ्या जमिनीमधे निचरा होतच नसेल तर तात्काळ उपाययोजना करावी लागेल, एकरी 150 किलो एसव्हि फ्रुटर ड्रिपर खाली एक इंच मातीआड करावे व एकरी दोन लिटर एसव्हि59 + दोन लिटर एसव्हिके ड्रिप एकत्र करून ठिबक मधून सोडावे, यातील प्रचंड मोठ्या संख्येने आलेले जिवाणू लगेच कामाला लागतात या जिवाणू ना एसव्हि फ्रुटर मधून भरपूर खाद्य ऊपलब्ध झाल्यामुळे ते जिवाणू वेगवान हालचाली करून जमिन पोकळ करतात ,  चार आठ दिवसात या जमिनीत गांढूळाची संख्या वाढायला लागते व फारच कमी वेळात जमिनीचा निचरा चमत्कार झाल्यासारखा वाढतो, जमिनीत अडकलेले अतिरिक्त क्षार विरघळले जातात व द्राक्ष वेलीस जमिनीत असणारी अन्नद्रव्ये सहज ऊचलुन घेता येतात व जमिनीच्या आरोग्या बरोबरच चांगल्या दर्जाच्या द्राक्ष घडांची निर्मिती करणेही सहज सोपे होऊन जाते.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्