blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ५

बहुवर्षायु वनस्पतींचे बहार येणे किंवा नियमित  उत्पादन देणे हे हवामानात होणारे बदल  व भौतिक परिस्थितीत होणारे प्रचंड टोकाचे बदल यावर अवलंबून असते . वनस्पतींना जर फारच सुखदायक हवामानात, अखंड व नियमित पाणी अन्न मिळत राहिले तर त्या वनस्पती कमी किंवा अनियमित उत्पादन (फुले, फळे,  बिया इत्यादी) देतात. अगदी ऊदाहरणच द्यायचे झाल्यास कोकणात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो इतका पाऊस पडतो की जमिनीत ऊपलब्ध असनारी बरिचशी अन्नद्रव्ये अती निचरा होऊन वाहून जातात पण पावसाळा संपला की त्याच कोकणात अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते, एवड्या कमालीची विषम परिस्थितीतही तेथिल आंब्याला नियमित बहार येतो व भरपूर उत्पादन मिळते.  इकडे देशावर म्हणजेज पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात होतो पावसाळा संपला तरी पाणी परिस्थिती चांगली असते पण इकडच्या आंबा बागांना नियमित बहार येत नाही (काही आंबा झाडांना एक वर्ष आड आंबा लागतो) याच खास  कारण म्हणजे आपल्याकडील  आंबा झाडांमधे निगेटिव्ह चार्ज  चा प्रवाह नियमित जास्त काळ  चालूच रहातो व कोकणात मात्र निगेटिव्ह चार्ज चे रूपांतर निगेटिव्ह फोर्स मधे लवकरच होत असते. आता हा निगेटिव्ह फोर्स द्राक्ष वेलीवर कसे काम करतो पाहूया, खरड छाटणी नंतर बागेस भरपुर अन्न व पाणी देऊन निगेटिव्ह चार्ज नियमित केला जातो (मुळे सक्रिय केली जातात तेव्हाच जमिनीतुन अन्न पाणी वर सरकते) तेव्हाच नविन काड्या व अन्नद्रव्ये साठवूनक करणारी पाने तयार होतात. याच काळात भरपुर व नियमित सुर्यप्रकाशाची ही गरज असते याच काळात मुळे प्रचंड आक्रमक झालेली असतात. याच काळात द्राक्ष वेलीस आवश्यक असणारी अन्नद्रव्ये पुरवठा करणे गरजेचे असते, जेवढा निगेटिव्ह चार्ज चा प्रवाह जास्त काळ राहिल त्याच प्रमाणात मालकाड्या तयार होणे व पुढे उत्पादन किती तयार होने हे अवलंबून असते. द्राक्ष बागेत  साधारणपणे 120 ते 135 दिवस ही प्रक्रिया चालु असावी लागते. सुरवातीचा काळ म्हणावे खरड छाटणी नंतर बागेची काडी निर्मिती होत असताना जर हवामानात थोडाही फरक पडल्यास किंवा ढगाळ वातावरण, अकाली पाऊस पडल्यास लगेच थेट पहिला परिणाम हा द्राक्ष मुळीवर  होत असतो, पान देठात तयार होणारा धन भार मंदावतो परिणाम निगेटिव्ह चार्ज चा प्रवाह थांबतो परिणामी मुळीचे कार्य अचानक बंद पडते प्रसंगी द्राक्ष वेल आजारी सुद्धा पडते (डाऊणी, करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो) पुढे याच कारणामुळे घड जिरन्याची समस्या तयार होते. (एसव्हि किटोन याच काळात नियमित वापर झाल्यास म्हणजे जमिनीतुन व पानांवाटे वापरल्यास ते द्राक्ष मुळांना काम तात्काळ काम बंद करू देत नाही,  वनस्पती च्या याच संस्थेत किटोन खुबिने काम करते). थोडक्यात काडी पक्व होईपर्यंत मुळीचे काम विनासायास सुरळीत चालणे गरजेचे असते. पुढिल फळ छाटणी च्या अगोदर 15 ते 20  दिवस बागेस अन्न पाण्याचा  ताण द्यावा म्हणजे काडीवरिल डोळ्यामधे घड निर्मिती होते,  याच ताण देण्याच्या काळात द्राक्ष वेलीत प्रचंड बदल चालु होतात, (ताण देने म्हणजे अचानक पाणी देने बंद, खत देण्यासाठी बेड वर खड्डे पाडने, बेडवरिल माती मोकळी करने इत्यादी) जवळपास  4 -5 महिने द्राक्ष वेल मजेत असते मुळे चांगली सक्रिय असतात आणी अचानक हे सगळे चोचले बंद होतात,  द्राक्ष वेलीची मुळे कोरडी पडतात अन्न पाणी पुरवठा बंद होतो (मुळाना एक प्रकारचा झटका बसतो) द्राक्ष वेल याच काळात जगण्यासाठी प्रचंड धडपड करते, पाने, काडी व खोडात धन भार सक्रिय असतो पण तो धन भाराचा प्रवाह जमिनीकडे पोहचू शकत नाही, अतिशय क्षीण झालेल्या निगेटिव्ह भारामुळे पाने व शेंड्याकडून आलेली द्रव्ये मुळांपर्यंत येऊन थांबतात व हा प्रवाह वेग अचानक थांबतो यालाच निगेटिव्ह फोर्स म्हणावे लागेल. (या सगळ्या धडामोडी अतिशय वेगाने व कमी कालावधित घडते) शेंडा व पाने पोषन होत असताना यातीलच काही द्रव्ये व प्रक्रियेतुन तयार झालेली ऊदासीन द्रव्ये व धन भारित अन्न कण मुळीवाटे जमिनीत परत सोडत असतात परंतु निगेटिव्ह फोर्स मध्ये मुळी काम करणे बंद झालेली असते (निगेटिव्ह भार कमी झाल्यामुळे) मुळी पांढरी व कोवळी न रहाता ती तपकिरी व जून झालेली असते, या मुळीत याच काळात अनेक प्रकारचे  क्षार व काही विषारी द्रव्ये जमा झालेली असतात (गार्बेज एन्झाईम्स) अगदी याच काळात द्राक्ष वेल पुनरुत्पादनाकडे वळते व परिणामी काडीवरी डोळ्यात घड निर्मिती होते,  मगच या द्राक्ष वेलीकडून इच्छीत उत्पादन घेता येणे सहज शक्य  होते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्