blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ३

ताज्या वनस्पती ऊत्तम विद्युत वाहक असतात (धातूंची तार अती सुवाहक असते) तशिच वनस्पतींची मुळे ही विद्युत वाहक असतात. परंतू कधी तरी या  सिस्टम मधे अडथळे तयार होतात, मुळांची विद्युत वाहकता मंदावते, ही  मुळे  ऊर्जा जमीनीत जाऊ देत नाहीत, अश्या वेळी खोडातच ती ऊर्जा साठविली जाते, परिणामी खोडे फुगिर होतात (हिच ऊर्जा पुढे फुल व फळ निर्मिती साठी वापरली जाते) आता थोडे सोपे वाटेल, (प्रत्येक वेळी मुळे सक्रियच हवित असे नाही) आता ही ऊर्जा कोनत्या स्वरुपात असते तेही महत्वाचे आहे, ही ऊर्जा वेगवेगळी अन्नद्रव्ये व संप्रेरके च्या माध्यमात असतात, (कॅरियर एजंच चे काम विद्युत भार सांभाळत असतो). आता द्राक्ष वेलीच्या मुळांचे काम पाहू, पाने व शेंड्याकडून जमिनीकडे जाणारा प्रवाह नियंत्रणात ठेवण्याचे काम मुळे करत असतात व जमीनीतुन वरती लागणारी घटक द्रव्ये वरती खेचणे ही दोन्ही कामे मुळेच पहातात, ज्यावेळी वरून खाली ऊर्जा प्रवाह जात असतो अगदी त्याच वेळी एक प्रवाह खालुन वरती चाललेला असतो (वर जानारा प्रवाह ऊलटा आहे). या दोन्ही प्रवाहाचा संगम अनेक वेळा  होत असतो याच वेळी वेगवेगळी संप्रेरके (हार्मोन्स) तयार होत असतात. यातील सायटोकायनिन नावाचे संप्रेरक व जिब्रेलिन्स नावाचे संप्रेरक ही महत्त्वाची संप्रेरके आहेत,  परंतू इथेच मुळांचा रोल महत्त्वाचा असतो, मुळे याच वेळी सक्रिय (पांढरे मुळ) असावे लागते.  असो.  पाढरी मुळे सक्रिय केव्हा असतात, जेव्हा वरून खाली आलेल्या प्रवाहातून आलेली खनिज द्रव्ये मुळांनी जमिनीत (डिसचार्ज) सोडलेली असतात.  ही वेगवेगळी खनिज द्रव्ये जमीनीतुनच वर गेलेली असतात व परत फिरून त्यातलीच काही परत जमिनीत सोडली जातात,  ती अन्नद्रव्ये मुळानांच चिकटून असतात, अगदी त्याच काळात मुळे सर्वात जास्त सक्रिय असतात. ( घरात विद्युत उपकरणे जोडलेली असतात व त्या ऊपकरनाला शाॅक बसु नये म्हणून एक आर्थिंग वायर जमिनीत गाडलेली असते,  ती आर्थिंग तेव्हाच चांगले काम करते जेव्हा तिथे मीठ, कोळसा व पाणी टाकले जाते,  मीठ विद्युत प्रवाह सुवाहक आहे व कोळसा कार्बन आहे दोन्ही घटकांमुळे विद्युत प्रवाह वेगाने डिसचार्ज होतो) अर्थातच मुळे तेव्हाच सक्रिय होतात जेव्हा जमीनीत पुरेसी अन्नद्रव्ये व कार्बनिक पदार्थ ऊपलब्ध आहेत. आता या वेळी कोनती अन्नद्रव्ये असावि लागतात ते पाहू, द्राक्ष वेलीत विश्रांती काळात फाॅस्फरस, पोटॅशियम, गघंक, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही द्रव्ये अधिक प्रमाणात असावी लागतात या विजातीय अन्न घटकांच्या उपस्थिती मुळे जमीनीत मुळे काही काळ सक्रिय होतात व या घटकांना घेऊन वर पाठवितात अगदी त्याच वेळी वरून एक प्रवाह नायट्रोजन,  सोडियम, क्लोरिन , फेरस, झिंक सारख्या विजातीय घटकांना घेऊन खाली सरकत असतो. नेमके याच संयोगातुन अॅसकाॅरबिक अॅसिड,  सायटोकायनिन, घटकांची निर्मिती होते व परिणामी लिग्निन नावाचे एक रसायन तयार होते, हे लिग्निन व सायटोकायनिन नंतर वरून खाली जानारा प्रवाह अडविते व मग सर्वच ऊर्जा खोडातच स्टोअरेज च्या रूपात अडकून बसते. अगदी तसच झाल्यावर द्राक्ष वेलीची मुळे तपकिरी रंगाची दिसू लागतात, अर्थात ही प्रक्रिया अतिशय संथ गतिने घडत असते. या सर्व प्रक्रियेत निगेटिव्ह चार्ज  महत्वाची भुमिका बजावत असतो.                                   

 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्