blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २२

नमस्कार शेतकरी बंधूनो,  
बऱ्याच वेळा द्राक्ष बागांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागतो, अगदी बर्फ तयार होण्याइतपत तापमान खाली येते, या प्रचंड थंडी मुळे माझ्या द्राक्ष बागेचे काही नुकसान तर होनार नाही ना या चिंतेने शेतकरी बंधू धास्तावतात, आणी बागेचे संरक्षण करण्याच्या नादात चुकिची उपाययोजना केल्यास प्रसंगी नुकसान होऊ शकते, हे नुकसान होऊ नये म्हणून अती थंडी तापमानात द्राक्ष बागेवर काय परिणाम होतात हे आपण आज पाहणार आहोत.  सर्वसाधारणपणे पाण्याचे किंवा दवबिंदूचे बर्फात रूपांतर होण्यासाठी हवेतील सापेक्ष तापमान से 4 अंश डिग्री सेल्सियस च्या खाली आले तरच बर्फ तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. साधारणपणे तपमान 4 अंशाच्या खाली रात्रभर नसते, पहाटे पाच वाजल्या नंतर तापमान वेगाने खाली येते, आपल्याकडे अगदी पहाटे  साडेपाच  ते सात या वेळेतच पाणी व दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया होते व व नंतर सुर्योदयानंतर हळूहळू तपमान वाडायला सुरवात होते, द्राक्ष वेलीवर इतक्या कमी तपमानाचा निच्छितच परिणाम होतो, मुळांचे काम मंदावते, व घडातील मणी सुद्धा फुगवन थांबते, काही पानांवर व मण्यांवर  दव गोठून बर्फ दिड तासा पेक्षा जास्त काळ साठून राहिल्यास अश्या भागावर करपल्याचे डाग पडतात, द्राक्ष वेलीची चयापचय क्रिया मंदावते परंतु थांबत नाही, प्रकाशसंश्लेषन क्रिया मात्र चालूच रहाते, याच कारण म्हणजे आपल्याकडे पाणी गोठण्याची क्रिया संपूर्ण दिवसभर नसते, पहाटे पासून सकाळी आठ पर्य॔तच ही अवस्था टिकते व दिवस भर जरी तापमान कमी असले तरी गोठन बिंदू इतके नसते सुर्यप्रकाशाचा कालावधी मात्र कमी झालेला असला तरी पाणी , कार्बन डाय ऑक्साईड  व सुर्यप्रकाश मिळून कर्बोदके ( शर्करा CHO ) निर्मिती ही धिम्या गतीने चालूच रहाते, याचा एक परिणाम असा होतो की द्राक्ष मण्यांमधे पेशी विभाजन थांबते, क्वचित प्रसंगी विकृती ही येऊ शकते, मणी फुगवन संथ गतीने होते, साखर निर्मिती मंदावते, आंथ्रोसायनिन चे प्रमाण वाढून आम्लता वाढते व मणी आंबट बनायला सुरवात होते, याच काळात विनाकारण रासायनिक खतांचा भडिमार केल्यास मणी तडकण्याची क्रिया चालू होते, कारण मुळांचे कार्य मंदावलेले असते, त्या मुळे अन्नद्रव्ये पुरवठा होत नाही, याचा अर्थ असा असतो की मणी फुगवन वेग मंदावतो व द्राक्ष तयार होण्यासाठी लागणारा कालावधी हा लांबतो, बस इतकेच  हे सर्व टाळायचे असल्यास उपाययोजना करता येईल,  ती पुढील प्रमाणे,दवबिंदू गोठतात ते पहाटे साडेपाच  ते सात या वेळेतच याच वेळेत बागेत धुर तयार करावा व ठिबक संच ही चालू करून पाणी देत रहावे,  सकाळी विहरिचे किंवा शेततळ्याचे पाणी गरम असते व धुरा मुळे बागेतील तापमान गोठनबिंदूच्या खाली येत नाही अगदी बागेत वेगवेगळ्या अंतरावर चार पाच ठिकाणी शेकोटी करून धूर केल्यास त्या बागेत दवबिंदू गोठणार नाही, व बर्फामुळे पानांना होणार्या इजा व डाग पडणार नाहीत, हा प्रकार रोज पाच सहा दिवस कंटिन्यु करावा लागेल, कारण दव गोठण्याइतपत कमी तपमान जास्त दिवस टिकत नाही, एसव्हि किटोन चा फवारणी व ड्रिपमधून वापर केल्यास प्रकाशसंश्लेषन क्रिया चालुच राहील, अधून मधून अल्प प्रमाणात एनपिके फवारणी मधूनही देता येइल, याच काळात एसव्हि फ्रुटर चा ड्रिप खाली वापर केल्यास मुळे एवढ्या कमी तपमानात सुद्धा कार्यक्षम राहतील, खरे तर याच काळात मुळांवर निगेटिव्ह चार्ज असायला हवा आहे, तो चार्ज एसव्हि फ्रुटर बेमालूमपणे तयार करते, अगदी त्याच वेळी फवारणी मधून पानांवर पाॅजिटिव्ह चार्ज  तयार करायचे काम एसव्हि किटोन + चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट किंवा 13:00:45 किंवा 19:19:19 अल्प प्रमाणात तयार करेल. पाने, मुळे, व मण्यांची फुगवन व शर्करा निर्मिती चालू राहील,  व अती थंडीत सुध्दा आपली बाग सुरक्षित राहू शकेन. सविस्तर उपाययोजना पुढिल प्रमाणे करता येईल, एकरी 100 किलो एसव्हि फ्रुटर ड्रिपरखाली टाकून रोज पहाटे साडेपाच ते सात या वेळात कमी दाबाने पाणी देने, दुसर्या दिवशी एकरी पाच लिटर एसव्हि साईज बिल्डर सोडने, फवारणी साठी 200 लिटर पाण्यात 250 मिली एसव्हि किटोन + 100 ग्राम चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट + 300 ग्राम 13:00:45 एकत्र मिसळून फवारणी करावी, तीन दिवसांनी एकरी एक एक लिटर एसव्हि किटोन ड्रिपमधून सोडावे, म्हणजे मण्यांमधे कुठलिही विकृती न येता अती थंडीतही फुगवन चालूच राहील.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्