द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २
वनस्पती सोडून इतर सजिवांना ऊर्जा प्राप्तीसाठी वनस्पती किंवा इतर सजिवांचा आधार घ्यावा लागतो मात्र वनस्पती कुनाचाच आधार घेत नाही उलट निसर्ग च वनस्पती ला आधार देत असतो. वनस्पतीला लागणारी ऊर्जा सुर्यप्रकाश, पाणी, हवा व माती संयोगातुन पुरविली जाते. याच प्रक्रियेत निगेटिव्ह चार्ज चा मोठा रोल असतो, निगेटिव्ह च का ?
वनस्पती ही मातीवर/ जमिनीवर स्थित असते व जमिन कुठल्याही प्रकारच्या विद्युत प्रवाहाला स्वतः कडे खेचते व निगेटिव्ह ( निष्क्रिय) करत असते. अर्थातच जमिनीवर ऊगवलेली / लावलेली वनस्पती ही ऊत्तम विद्युत सुवाहक (कंडक्टर) म्हणून काम पहाते. ( म्हणूनच आकाशात तयार झालेली धनभारित विज ऊंच झाडावर पडते नव्हे तर झाड या विजेला स्वतः कडे खेचून घेते) थोडक्यात वनस्पतींवर निगेटिव्ह चार्ज/भार अघिक असतो. व वनस्पती सतत बाहेरून येनारे सर्व प्रकारचे भार/ चार्ज स्वतः खेचून जमिनीकडे पाठवत असते, (अलिकडेच याच नियमांचा आघार घेऊन ESS नावाची आधुनिक फवारणी यंत्रणा काम करते, फवारणी द्रावणावर एका विशिष्ट तंत्राने प्रत्येक द्रावणाच्या सुक्ष्म कणावर पाॅजिटिव्ह चार्ज निर्माण केला जातो व द्राक्ष वेल नियमानुसार ते कण स्वतः कडे खेचून घेते). वनस्पती (द्राक्ष वेल) याच नैसर्गिक नियमामुळे स्वतः साठी लागणारे अन्न व पाणी वर वर खेचत असते, गंमत इथेच आहे, द्राक्ष वेलीत पाने इतर वनस्पतींच्या तुलनेत पाने मोठ्या आकाराची असतात, व ती जास्त सुर्यप्रकाश व कार्बन डाय ऑक्साईड ग्रहण करतात या दोहोंच्या संयोगातुन पाॅजिटिव्ह चार्ज/ ऊर्जा तयार होते. व ती तात्काळ ( सगळी नव्हे, काही पोषणा साठी, काही हालचाली साठी व काही निष्क्रिय करण्यासाठी) काही प्रमाणात नियमानुसार जमिनीकडे ( via Phloem ) पाठविली जाते. अगदी त्याच वेळी किंवा तेव्हाच जमिनीतून एक अन्न व पाणी घेऊन जाणारी तुकडी (via Xylem) पानांकडे सरकते.
लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अॅग्रो सोल्युशन्स्