blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १६ 

नमस्कार शेतकरी मित्राने, आपल्या द्राक्ष बागेतुन ऊत्तम व निर्यातक्षम द्राक्ष निर्मिती करणे हे प्रत्येक द्राक्ष बागाईतदाराचे स्वप्न असते,आणि तसा प्रयत्न ही प्रत्येक जन करत असतो, परंतू आजकाल अनेक बागाईतदार प्रत्येक वेळी संघर्षच करताना दिसतात, यास अनेक कारणेही  आहेत, तरिही  कोनत्याही परिस्थितीत ईच्छित उत्पादन व दर्जा कायम ठेऊन नियोजन करावे लागेल, या नियोजना साठी द्राक्ष वेलीचीच मदत घ्यावी लागेल, द्राक्ष वेलीत असणारे मजबुत स्टोअरेज (अन्न साठा) हिच वेलीची ताकत असते, द्राक्ष वेलीत असनारी ताकत व प्रतिकारक्षमता अचूक  मोजण्याची साधने अजून ऊपलब्ध (विकसित) झालेली नाहित तरिही थोड्याश्या अनुभवाने हे ओळखने जमु शकते . वेलीत भरपूर प्रतिकार  क्षमता ही त्या वेलीस ऊपलब्ध  झालेल्या अन्नद्रव्यावर अवलंबून असते, तथापी कर्ब नत्राचे गुणोत्तर साधल्यास (10 : 1) द्राक्ष  बागेत चांगली प्रतिकार क्षमता तयार होते व उत्पादन ही चांगले सहज मिळवता येते. द्राक्ष बागेस  नेमकी किती खते द्यावयाची सरळ मुद्यांवरच येऊयात, विश्रांती काळापासूनच सुरवात करूयात, साधारणपणे द्राक्ष बागेतील सर्वच घडांची काढणी (हार्वेस्टिंग)पुर्ण झाल्यावर दोन तिन दिवसातच  एकरी 100 किलो डिएपी मधल्या मोकळ्या जागेत एकसारखे फोकून टाकून लगेचच भरपूर मोकळे पाणी सोडावे म्हणजे मग पहिल्या उत्पादना मुळे आलेला द्राक्ष वेलीचा  तनाव दुर होईल.मोकळे देन्या ईतके पाणी नसल्यास मधोमध एक ऊथळ खोलीचे तास पाडून त्यात डिएपी टाकून वरती एक ठिबकची लाईन बसवून घ्यावी व किमान सहा तास पाणी ड्रिपमधून सोडावे, मात्र बोधावर डिएपी देऊ नये कारण उत्पादन तयार करण्याच्या काळात मुळांना सतत काम करून एक प्रकारची मरगळ आलेली असते, व मधल्या पट्ट्यात डिएपी व पाणि मिळाल्यावर अन्नद्रव्याच्या अमिशाने मुळे पुढे सरसावतात व परत ताजी तवाणी होऊन कामास लागतात, या काळात द्राक्ष वेलीची पहिल्या उत्पादना मुळे  झालेली झीज भरून काढली जाते.  (डिएपी व पाण्याच्या ओलाव्यामुळे मुळांच्या शेंड्यावर निगेटिव्ह चार्ज वाढतो व याच काळात वेलीच्या खोड व पानातील जमा झालेली विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात) नंतर आपली जमिन जर काळी व भारी असल्यास विस दिवस व जमिनी मध्यम ते हलकी असल्यास दहा बारा दिवसासाठी विश्रांती साठी सोडून द्यावी. या काळात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हलके पाणी देण्यास हरकत नाही, जमल्यास मोकळे पाणी देण्यापूर्वीच मोकळ्या पट्ट्यात थोडेसे बाजरी,गहू  व ज्वारीचे बियाणे एकत्र करून  विस्कटून टाकावे म्हणजे ते आठ दहा दिवसात दोन तिन इंचा पर्यंत ऊगवुन येईल एप्रिल छाटणी करण्या पुर्वी च ते लहान ऊगवलेले धान्य कुळव किंवा ट्रॅक्टर ने मोडून टाकावे (हिरवळीचे मिनी खत) याच खतासोबत दोन खोडाच्या मधे लहान चर खोदून पाच सहा टन ऊत्तम कुजलेले मिक्स कंपोष्ट खत टाकले तरी चालेल. जमल्यास बेडवर ऊसाचे पाचटाचे आच्छादन करून घ्या  व योग्य  वेळ पाहून एप्रिल छाटणी करून घ्यावी, खरड छाटणी नंतर तापमान जर जास्त असेल तर दोन तीनदा बागेस  मोकळे पाणी सोडावे, वेलीच्या ओलांड्यावर हायड्रोजन सायनामाईड चे पेस्टिंग किंवा फवारणी करून घ्यावी म्हणजे सगळ्या बागेत एकसमाण व लवकर फुटी निघतील. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्