blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १५

शेतकरी बंधूनो ऊत्तम दर्जेदार द्राक्ष निर्मिती साठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर द्राक्ष बागेत सतत करावा लागेल, प्रत्येक वर्षी साधारणता एकरी 10 ते 12 टन सेंद्रिय खत द्राक्ष बागेस दिले जावे तथापी  एकाच प्रकारचे शेनखत किंवा कंपोष्ट संपूर्ण देण्यापेक्षा ऊत्तम कुजलेले शेनखत 40 % ,  हिरवळीचे खत 20%, प्रेसमड 10%, गांढूळ खत 10%, विविध प्रकारच्या सेंद्रिय पेंडी 10% , बाॅयलर पोल्ट्री खत 7 % व तयार भुसुधारक खत 3% हे सगळे घटक एकत्र करून एकाच वेळी देण्यापेक्षा दोन भागात दिल्यास अधिक फायदेशीर राहील, पैकी हिरवळीचे खत विश्रांती काळात दिलेले योग्य ठरेल, या शिवाय देशी गाईचे शेन व गोमुत्रा पासून तयार केलेली स्लरी किमान महिण्यातून एगदा देता येईल. तसेच विविध प्रकारची जिवाणू खते वेळोवेळी दिल्यास  फारशी रासायनिक स्वरूपातील खते मोठ्या प्रमाणात देण्याची गरज भासणार नाही, द्राक्ष वेलीस सर्वाधिक जास्त प्रमाणात  लागणारे अन्नद्रव्य म्हणजे नत्र होय. एप्रिल छाटणी किंवा  ऑक्टोबर छाटणी पुर्वी माती परिक्षण केल्यास जमिनीत असणारे ऊपलब्ध नत्राचे प्रमाण समजू शकते, जमिनीत सेंद्रिय कार्बने किती % प्रमाण आहे यावर नत्र किती हे सहज समजते, समजा आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.80 % च्या आसपास असल्यास त्या जमिनीत ऊपलब्ध नत्राचे प्रमाण हेक्टरी  500 किलोच्या जवळपास असतेच असते, यातील 20 % नत्र काही कारणांमुळे अनुपलब्ध झाले तरिही 400 किलो नत्र शिल्लक व ऊपलब्ध होऊ शकते, या शिवाय द्राक्ष बागेस  नियमित दिले जाणारे पाणी प्रयोगशाळेत परिक्षण केल्यास पाण्यातील नायट्रेट चे प्रमाण प्रती लिटर मधे 80 ते 185 पीपीएम एवढे आढळून येत आहे आणि पाण्यात विरघळलेले नायट्रेट सर्वाधिक पिकांकडून शोषले जाते, द्राक्ष बागेचा विचार केल्यास अशा पाण्याच्या माध्यमातून अंदाजे एकूण वर्षभरात हेक्टरी 125 किलो च्या आसपास नत्र ऊपलब्ध होऊ शकते, तसेच पावसाळ्या पुर्वी व पावसाळी वातावरणातून जमिनीत व द्राक्ष वेली कडून शोषन होनारे नत्र ही हेक्टरी 100 ते 150 किलो ऊपलब्ध होत असते, आणि आपण जे सेंद्रिय घटक देणार आहोत यातून ही हेक्टरी 150 किलो नत्र द्रव्याचा  पुरवठा होतो. (हेक्टरी एकूण 25 टन सेंद्रिय खतांमधून 0.6 % दराने नत्र ऊपलब्ध होईल असे गृहित धरूयात), आता आपल्या द्राक्ष बागेस एकूण 775 ते 800 किलो नत्र या सर्व परिस्थितीत आरामात मिळू शकते.  आता आपण नत्र किती शिफारस आहे ते पाहूयात,  मागील भागात आपण पाहिले की द्राक्ष बागेस हेक्टरी 900 किलो नत्र लागते म्हणजे आता हिशोब केल्यास हेक्टरी 100 ते 125 किलो नत्र अजून कमी पडते आहे, हे कमी पडलेले नत्र दोन्ही छाटणी वेळेस विभागुन द्यायचे ठरले तरी एका वेळी हेक्टरी  110 किलो युरिया देऊनही बागेची संपूर्ण नत्राची मात्रा पुर्ण होऊ शकते. द्राक्ष वेलीस नत्र पुर्ण क्षमतेने मिळाल्यास द्राक्ष वेलिच्या वाढीबरोबरच उत्पादन ही चांगले मिळते परंतू हेच नत्र गरजेपेक्षा जास्त झाल्यास द्राक्ष बागेवर वेगवेगळे दुष्परिणाम ही होतात, गरजेपेक्षा अती प्रमाणात नत्र पुरवठा केल्यास वेलीची अतिरिक्त वाढ होणे, अलावश्यक फुट होणे, पानांची  संख्या गरजेपेक्षा जास्त होते, पानांची जाडी कमी होते, पाने व काडीचा ठिसूळ पणा वाढतो त्यामुळे डाऊणी व भुरी सारखे  बुरशी लगेच वेलीत प्रवेश करते, रस शोषून घेनार्या किडी  प्रमाणापेक्षा जास्त वाढतात, घड पक्वतेचा कालावधी वाढतो या शिवाय अतिरिक्त नत्रामुळे इतर काही अन्नद्रव्ये वेलीस वेळीच ऊपलब्ध होत नाहीत. केवळ नत्र द्रव्याच्या असंतुलना मुळे च आज अनेक द्राक्ष बागाईतदार अनेक समश्यांना तोंड देत आहेत. म्हणुनच नियमित माती परिक्षण करूणच खतांचे संतुलन साधणे गरजेचे झाले आहे. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्